TRENDING:

पितृपक्षात या 7 चुका अजिबात करू नका! अन्यथा पितृदोष होऊन भोगावे लागणार वाईट परिणाम

Last Updated:
Pitru Paksha 2025 : हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानले जाते. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा पंधरवडा पूर्वजांना स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो.
advertisement
1/8
पितृपक्षात या 7 चुका अजिबात करू नका! अन्यथा पितृदोष झालाच म्हणून समजा
हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानले जाते. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा पंधरवडा पूर्वजांना स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो. यंदाही पितृपक्षाला सुरुवात झाली असून देशभरातील श्रद्धाळू आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण व पिंडदान करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवसांत पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. त्यामुळे या कालावधीत योग्य विधींचे पालन करणे व काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
2/8
<strong>1) श्राद्ध टाळणे किंवा निष्काळजीपणा करणे -</strong> श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान हे पितरांना अर्पण करण्याचे प्रमुख विधी आहेत. हे विधी न करणे किंवा दुर्लक्ष करणे हा पितरांचा अपमान मानला जातो.
advertisement
3/8
<strong>2) चुकीच्या दिवशी श्राद्ध करणे -</strong> प्रत्येक पूर्वजासाठी विशिष्ट तिथी निश्चित केलेली असते. चुकीच्या दिवशी केलेले श्राद्ध कमी फलदायी ठरते. योग्य तिथी व योग्य वेळेत श्राद्ध केल्यास त्याचे फळ अधिक मिळते.
advertisement
4/8
<strong>3) शुद्धतेकडे दुर्लक्ष -</strong> श्राद्धादरम्यान शरीर आणि मनाची शुद्धता आवश्यक आहे. स्नान न करता किंवा अशुद्ध मनाने विधी करणे योग्य मानले जात नाही.
advertisement
5/8
<strong>4) मांस-मद्य सेवन करणे -</strong> पितृपक्षात तामसिक अन्नपदार्थ जसे की मांस, मासे, अंडी किंवा मद्य सेवन निषिद्ध आहे. यामुळे पितरांचा अनादर होतो, असे धार्मिक मानले जाते.
advertisement
6/8
<strong>5) नवीन कार्यांचा आरंभ -</strong> लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा अन्य कोणतेही शुभ कार्य या काळात करणे अशुभ मानले जाते. पितृपक्ष संपल्यानंतरच अशा गोष्टी कराव्यात.
advertisement
7/8
<strong>6) अनावश्यक खरेदी -</strong> पितृपक्ष हा पूर्वजांना अर्पण व दानधर्मासाठी आहे. या काळात नवीन कपडे, दागिने किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करणे टाळावे.
advertisement
8/8
<strong>7) भांडण व नकारात्मकता -</strong> या दिवसांत घरात भांडणे, राग किंवा नकारात्मक वर्तन टाळावे. अशा कृतींमुळे पूर्वजांची आत्मा दुखावली जाते, असे मानले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
पितृपक्षात या 7 चुका अजिबात करू नका! अन्यथा पितृदोष होऊन भोगावे लागणार वाईट परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल