'लोक नजर लावतात आणि...', बॉलिवूडमधील पॉलिटिक्सवर स्पष्टच बोलली अमृता राव, सांगितला भयानक अनुभव
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amrita Rao : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमृता राव बऱ्याच वर्षांनंतर ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परत आली आहे.
advertisement
1/6

मुंबई: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमृता राव बऱ्याच वर्षांनंतर ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परत आली आहे. तिच्या कामाची खूप प्रशंसा होत आहे. याच काळात तिने बॉलिवूडमधील राजकारण आणि ‘नजर’ याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.
advertisement
2/6
अमृता राव नुकतीच रणवीर इलाहाबादियाच्या एका पॉडकास्टमध्ये आली होती. तिथे तिने तिच्या करिअरबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलली.
advertisement
3/6
ती म्हणाली, “मी इंडस्ट्रीत कोणाचाही गॉडफादर नसताना सलग तीन सुपरहिट चित्रपट दिले होते. पण, काही गोष्टी अशा घडल्या की, मला वाटलं, ‘हे माझ्यासोबतच का होतंय?’”
advertisement
4/6
ती पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही लोकांच्या नजरेत येता, तेव्हा वाईट नजर लागतेच. लोक विचार करतात की, ‘ही कोण आहे?’ आणि मग नजर लागते. तुम्हाला हे ऐकून हास्यास्पद वाटेल, पण हे खरं आहे. मला याचा अनुभव आला आहे.”
advertisement
5/6
अमृताने तिच्या करिअरमधील एका वाईट घटनेबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “‘इश्क-विश्क’ हा चित्रपट सुपरहिट झाला. मी आणि शाहिद दोघेही सुपरस्टार झालो होतो. आम्ही एका अवॉर्ड शोसाठी फोटोशूट केलं होतं. पण, जेव्हा मी ते फोटोशूट पाहिलं, तेव्हा त्यात मी नव्हती. माझ्याऐवजी दोन मोठे सुपरस्टार होते, आणि मी त्यांच्या मागे उभी होती.”
advertisement
6/6
अमृता म्हणाली की, आधी तिला या गोष्टींचा खूप राग यायचा, पण आता नाही. तिने सांगितलं की, बाहेरचे लोक नेहमी तुम्हाला कमी लेखतात. जेव्हा ती नवीन होती, तेव्हा लोक तिला ‘ही खूपच बारीक आहे’ असं बोलायचे, आणि ही कोणतीही प्रशंसा नव्हती. पण, ती कधीही हारली नाही, कारण तिच्या कुटुंबाने तिला खूप पाठिंबा दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'लोक नजर लावतात आणि...', बॉलिवूडमधील पॉलिटिक्सवर स्पष्टच बोलली अमृता राव, सांगितला भयानक अनुभव