TRENDING:

पुरी तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं तुम्ही काय करता? अनेक महिला करतात 'या' चूका, ही आहे तेल वापरण्याची योग्य पद्धत

Last Updated:
बहुतांश वेळा लोक ते तेल फेकून देतात किंवा पुन्हा पुन्हा गरम करून वापरतात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पण जर हे तेल योग्य पद्धतीने साठवलं आणि पुन्हा वापरलं, तर ते सुरक्षित राहते आणि वाया जाणारं तेलही वाचतं. फक्त काही सोप्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
1/8
पुरी तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं तुम्ही काय करता? अनेक महिला करतात 'या' चूका
आपल्या घरात अनेकदा शक्यतो सणासुदीला पुरी, भजी, वडे किंवा इतर काही तेलकट पदार्थ बनवले जातात, तेव्हा कढईत बरेच तेल उरते. बहुतांश वेळा लोक ते तेल फेकून देतात किंवा पुन्हा पुन्हा गरम करून वापरतात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पण जर हे तेल योग्य पद्धतीने साठवलं आणि पुन्हा वापरलं, तर ते सुरक्षित राहते आणि वाया जाणारं तेलही वाचतं. फक्त काही सोप्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
2/8
पुरी किंवा इतर तळणं झाल्यानंतर तेल लगेच गाळण्याची चूक करू नका. गरम तेल गाळल्याने त्यातील पौष्टिकता कमी होते.तेल पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याला बारीक गाळणी किंवा मलमलच्या कपड्यातून गाळा.
advertisement
3/8
असं केल्याने त्यातले जळलेले कण, पीठाचे अवशेष किंवा पदार्थांचे तुकडे निघून जातात. हे कण राहिले तर पुन्हा गरम करताना ते हानिकारक रासायनिक घटक तयार करू शकतात. पण जर तुम्ही तेल साफ केलं तर तेल जास्त दिवस टिकतं आणि त्याचा स्वादही चांगला राहतो.
advertisement
4/8
तेल साठवण्याची योग्य पद्धततेल नेहमी स्टील किंवा काचच्या एअरटाइट डब्यात ठेवा. प्लास्टिकच्या भांड्यात तेल ठेवू नका, कारण त्यातून रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते. तेल थंड आणि अंधाऱ्या जागी ठेवा; गॅसच्या जवळ किंवा थेट उन्हात ठेवल्यास त्याचा स्वाद आणि गुणधर्म बिघडतात.तसेच, वेगवेगळ्या तेलांचा गोंधळ करू नका. राईचं तेल राईच्याच तेलासोबत, रिफाइंड रिफाइंडसोबतच ठेवा. यामुळे त्या तेलाचा मूळ स्वाद आणि गुणवत्ता टिकून राहते.
advertisement
5/8
तेल पुन्हा वापरण्याआधी त्याच्या आधी थोडा वास घेऊन बघा.जर तेलाला जळलेला आंबूस किंवा विचित्र वास येत असेल, तर ते लगेच फेकून द्या.असं तेल शरीरात फ्री रॅडिकल्स निर्माण करतं, जे हृदय, यकृत आणि त्वचेवर वाईट परिणाम करू शकतात.साफ आणि ताजा वास असलेलं तेल तुम्ही भाजी, पराठे किंवा तडका देण्यासाठी वापरू शकता.परंतु, तेल दोनपेक्षा जास्त वेळा गरम करू नका, कारण वारंवार गरम केल्याने त्यातील ट्रान्स फॅट वाढतं, जे आरोग्यासाठी घातक असतं.
advertisement
6/8
जास्त गढूळ झालेलं तेल फेकून देण्याऐवजी घरातील झाडांच्या कुंडीत मातीसोबत मिसळा.हे तेल कीटक आणि माशा दूर ठेवायला मदत करतं.
advertisement
7/8
म्हणून पुढच्या वेळी पुरी किंवा भजी तळून झाल्यावर उरलेलं तेल फेकण्याआधी या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. योग्य प्रकारे साठवलेलं आणि वापरलेलं तेल तुमचं आरोग्यही जपेल आणि वाया जाणंही टळेल.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पुरी तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं तुम्ही काय करता? अनेक महिला करतात 'या' चूका, ही आहे तेल वापरण्याची योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल