Health Tips : निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात कसा असावा आहार? फॉलो करा 'या' टिप्स
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिवाळ्याच्या दिवसात आपण आपल्या शरीराची काळजी घेत असतो. या दिवसात आपल्या आहाराकडे देखील लक्ष देणे गरजेचे असते.
advertisement
1/7

हिवाळ्याच्या दिवसात आपण आपल्या शरीराची काळजी घेत असतो. यामध्ये शरीराची त्वचा कोरडी पडू नये म्हणून त्यावर उपाय केले जातात. काहीजण अंगातील आळस झटकून व्यायामही करतात. मात्र या दिवसात आपल्या आहाराकडे देखील लक्ष देणे गरजेचे असते.
advertisement
2/7
या दिवसातील चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आहारामुळे पचनसंस्थेशी निगडित काही समस्यांनाही आपल्याला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरातील</a> आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी हिवाळ्यातील आहार हा कसा असावा या संदर्भात माहिती दिली आहे.
advertisement
3/7
खरंतर हिवाळ्यामध्ये बाहेरच्या थंड वातावरणामुळे बाह्य अग्नी शरीरात कोंडला जाऊन जठराग्नी वाढतो. त्यामुळेच या दिवसांत भूकही जास्त लागते आणि पचायला जड असलेले काही पदार्थ देखील सहज पचतात. मात्र यामुळेच बऱ्याचदा आपल्याकडून नको त्या पदार्थांचे अति सेवन केले जाते. आणि याचा परिणाम सर्वात आधी आपल्या पचनसंस्थेवर होतो, असे अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
advertisement
4/7
पचनसंस्थेवर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांच्या अतिसेवनामुळे हिवाळ्याच्या दिवसांत बऱ्याचदा जठराचे, आतड्याबाबत समस्या जाणवू लागतात. यामध्ये अपचन, जुलाब किंवा अतिसार, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्यांचा समावेश आहे. या सर्व समस्या हिवाळ्याच्या दिवसात अयोग्य आहारामुळेच आपले डोकेवर काढत असतात, असे अमृता सांगतात.
advertisement
5/7
हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात ताजी फळे, पालेभाज्या, कडधान्ये, तेलबिया, अशा घटकांचा समावेश असायला हवा. त्याच बरोबर हिवाळ्यात तीळ, शेंगदाणे, बाजरी यांचा देखील सेवन केले गेले पाहिजे. तर अती तिखट, अती मसालेदार, अती थंड पदार्थ, जंक फूड या सगळ्या गोष्टीही टाळायला हव्यात. या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आपण नक्कीच योग्य आहार घेऊन आपला हिवाळा सुखकारक करू शकतो, असेही अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे
advertisement
6/7
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात थंड वातावरणामुळे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण शरीरामध्ये जे काही विषारी घटक तयार होत असतात. ते शरीराबाहेर फेकले जाणे गरजेचे असते. त्यामुळे मुद्दाम पाणी पिण्याकडे लक्ष देऊन आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासू देऊ नये.
advertisement
7/7
दरम्यान आहारासोबतच हिवाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला व्यायामाची किंवा रोज काही वेळ चालणे, पळणे अशा गोष्टींची देखील सवय लावून घेणे हितकारक ठरते आणि त्यामुळेच हिवाळा ऋतू मध्ये कोणत्याही आजारांचा आपल्या शरीरावर परिणाम होत नाही,असेही अमृता सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात कसा असावा आहार? फॉलो करा 'या' टिप्स