Weather Alert: मराठवाड्यात आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, बीड, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्याला आस्मानी संकटाचा धोका पुन्हा वाढला आहे. आज बीड, संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही काळात मराठवाड्यावर आस्मानी संकट घोंघावत आहे. आज पुन्हा वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीचा धोका काही ठिकाणी असणार आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज तर 5 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात आज गारपिटीचा धोका असून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर परभणी, हिंगोली, धाराशिव नांदेड आणि लातूर या 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून काही ठिकाणी विजा पडण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे. 24 तासानंतर पुन्हा हवामान बदलणार आहे.
advertisement
4/5
नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांत देखील आज वादळी पावसाची शक्यता आहे. या भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असणार आहे. तर धाराशिवमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. याठिकाणी देखील आज पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी गुरुवारपासून पुन्हा हवापालट होणार आहे.
advertisement
5/5
दरम्यान, गारपिटीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आज पुन्हा गारपिटीचा धोका असून शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तर नागरिकांना देखील आरोग्य जपावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, बीड, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट