TRENDING:

पहिल्याच पावसात महाराष्ट्रात घडला चमत्कार? जमिनीतून आलं निळं पाणी

Last Updated:
पावसाळ्यात वीज कोसळणं, दरड कोसळणं, भूस्खलन अशा घटना घडतात. पण कधी जमिनीतून निळं पाणी आल्याचं तुम्ही ऐकलं तरी होतं का? (प्रतिनिधी : बालाजी निरफळ)
advertisement
1/5
पहिल्याच पावसात महाराष्ट्रात घडला चमत्कार? जमिनीतून आलं निळं पाणी
राज्यात नुकताच पाऊस सुरू झाला आहे. पावसाळ्यात सामान्यपणे वीज कोसळणं, दरड कोसळणं, भूस्खलन अशा घटना घडतात. पण धाराशिवमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. इथं चक्क जमिनीतून निळं पाणी आलं.
advertisement
2/5
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला येथे एका शेतात वीज पडली त्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी निघाल्याचं समोर आलं.
advertisement
3/5
एखाद्या ठिकाणी वीज कोसळली की तिथं सामान्यपणे आग लागते. पण इथं वीज पडली आणि जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाऊ लागलं.
advertisement
4/5
नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीही निर्माण झाली होती. या प्रकारानंतर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावचे तलाठी आणि डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी भेट दिली.
advertisement
5/5
वीज पडल्यानंतर जमिनीतून आलेल्या या निळ्याचे पाण्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान याचं नेमकं रहस्य काय हे शोधलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
पहिल्याच पावसात महाराष्ट्रात घडला चमत्कार? जमिनीतून आलं निळं पाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल