Vidarbha Weather : विदर्भात पुन्हा अवकाळी संकट, पुढचे 24 तास 7 जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आज 28 एप्रिल रोजी, काही जिल्ह्यांमध्ये ढग दाटण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे उन्हाच्या झळांमधून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

विदर्भात उन्हाचा कडाका अजूनही कायम असून, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात काहीशी घट बघायला मिळत आहे. मात्र उष्ण आणि दमट वातावरण अजूनही कायम आहे.
advertisement
2/7
आज 28 एप्रिल रोजी, काही जिल्ह्यांमध्ये ढग दाटण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे उन्हाच्या झळांमधून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
नागपूरमध्ये आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्याठिकाणी आज ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह दुपारनंतर काही भागांत पावसाच्या सरी पडू शकतात. नागपूरसह वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
4/7
अमरावती जिल्ह्यातही उष्ण आणि दमट वातावरण कायम कायम असून तेथील कमाल तापमान 41 अंशांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. येथेही वादळी वाऱ्यांसह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात कमाल तापमान 42 अंशांवर पोहोचणार असल्याने दुपारी व सायंकाळी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. काही भागांत वीज चमकण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उघड्यावर फिरणे टाळावे, तसेच वीज कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
6/7
बुलढाणा जिल्ह्यात मात्र परिस्थिती तुलनेने सौम्य राहण्याची शक्यता आहे. येथे तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहील व वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील बहुतांश भागात उन्हाळ्याचा प्रखर प्रभाव जाणवत आहे.
advertisement
7/7
मात्र, ढगाळ वातावरण व पावसाच्या शक्यतेमुळे काही उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही, वादळी वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचे संरक्षण करावे, तसेच सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather : विदर्भात पुन्हा अवकाळी संकट, पुढचे 24 तास 7 जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे