बारावीचा पेपर देऊन येणाऱ्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, उल्हासनगरमधील घटना, कारण....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.
advertisement
1/5

बारावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर एक भीम नगर भागात सायंकाळी ही घटना घडली .
advertisement
2/5
चेतन जैस्वाल हा विद्यार्थी विज्ञान शाखेत शिकतो. बारावीचा पेपर देऊन तो सायंकाळच्या सुमारास घरी येत होता. त्याच वेळेस भीम नगर परिसरात त्याला काही तरुणांनी अडवून त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
advertisement
3/5
चेतनचे वडील हे रिक्षा चालक असून ते काही अंतरावर होते. त्यांना हे कळताच त्यांनी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चेतनला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.
advertisement
4/5
चेतनच्या मारेकऱ्यांपैकी एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान पूर्वीच्या भांडणांचा राग मनात धरून चेतनवर हल्ला केल्याचं सांगितलं जाते आहे.
advertisement
5/5
या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. चेतनवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
बारावीचा पेपर देऊन येणाऱ्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, उल्हासनगरमधील घटना, कारण....