Weather Alert: कोकणात 2 महिन्यानंतर पावसाचा ब्रेक, हवामानात मोठे बदल, मुंबई, ठाण्यात आज काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: गेल्या 2 महिन्यांपासून कोकणात पावसाचा जोर कायम होता. आता मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र असून पावसाचा कोणताही इशारा नाही.
advertisement
1/5

गेल्या दोन महिन्यांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सतत मुसळधार पावसाचा इशारा होता. आज मात्र हवामानात मोठा बदल जाणवतोय. पावसाने आज विश्रांती घेतली असून नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय.
advertisement
2/5
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर आज हवामान तुलनेने शांत राहणार आहे. फक्त हलक्या रिमझिम सरी काही भागात कोसळतील. दिवसभर वातावरण ढगाळ राहील. कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 25°C असण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 12–15 किमी राहील.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबईत सोमवारपर्यंत झालेल्या पावसामुळे काही भागांत पाणी साचले होते. पण आज नागरिकांना हवामानाचा थोडासा दिलासा मिळणार आहे. दिवसभर हलक्या सरी येतील, परंतु मुसळधार पावसाचा धोका नाही. कमाल तापमान 29°C ते 30°C दरम्यान राहील, तर किमान तापमान सुमारे 24°C असेल. वाऱ्याचा वेग 10–13 किमी प्रतितास असेल.
advertisement
4/5
पालघरमध्ये आज हवामान खात्याने फक्त रिमझिम स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. ढगाळ वातावरण कायम राहील, तर उष्णता किंचित जाणवू शकते. दिवसभरात तापमान 24°C ते 29°C दरम्यान राहील.
advertisement
5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मागील दोन महिने मुसळधार पाऊस झाला होता. मात्र आज मुसळधार पाऊस नाही. काही भागांत तुरळक रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. याठिकाणी कोणताही अलर्ट नाही. दिवसभर वातावरण सौम्य पावसाचं राहील. कमाल तापमान 29 अंश ते 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात 2 महिन्यानंतर पावसाचा ब्रेक, हवामानात मोठे बदल, मुंबई, ठाण्यात आज काय स्थिती?