Weather Alert: महाराष्ट्रावर संकट अजून टळलं नाही, गुरुवारीही धोक्याचा! 7 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 24 तास हे ठाणे आणि घाट माथ्यावर पावसाचे असणार आहेत.
advertisement
1/7

उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 21 ऑगस्टनंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पाहुयात 21 ऑगस्टला हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 24 तास हे ठाणे आणि घाट माथ्यावर पावसाचे असणार आहेत.
advertisement
3/7
तर पालघर, मुंबई शहर आणि उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता 21 ऑगस्टला देण्यात आली असून पुण्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कुठेही जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही.
advertisement
4/7
21 ऑगस्ट रोजी कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे जिल्ह्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
नाशिकच्या घाट परिसरालाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यामध्ये कुठलाही अलर्ट किंवा इशारा हवामान विभागाने जारी केलेला नाही.
advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 26 ते 30 सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
एकंदरीत मागील आठ ते दहा दिवसांपासून राज्यावर असलेला पावसाचा जोर आता हळूहळू कमी होणार आहे. त्याचबरोबर राज्यात पुढील काही दिवस पावसाची उसंत असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर संकट अजून टळलं नाही, गुरुवारीही धोक्याचा! 7 जिल्ह्यांना अलर्ट