Weather Report : महाराष्ट्रात इथं उष्णतेची लाट तर कुठे कोसळणार पाऊस, हवामान विभागाकडून स्पेशल अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
19-20 एप्रिल रोजी राज्यात पुन्हा हिटवेव आणि दुसरीकडे रिमझिम पावसाच्या सरी असं दोन्ही वातावरण पाहायला मिळू शकतं.
advertisement
1/6

महाराष्ट्रात सध्या विचित्र वातावरण पाहायला मिळत आहे. कुठे अति उकाडा तर कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
2/6
शहापूर मध्ये आज सर्वात जास्त तापमानाने उच्चांक गाठला आहे. आजचे तापमान हे 44°c डिग्री नोंदविण्यात आले आहे. सतत 3 दिवस ठाणे जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली असून शहापूर मध्ये सर्वात जास्त तापमानाने उच्चांक गाठला आहे.
advertisement
3/6
हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
advertisement
4/6
कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
रायगड, रत्नागिरी, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यांमध्ये 18 एप्रिल रोजी पावसाचा अलर्ट दिला आहे. बीड, सोलापूर,जळगाव, नाशिक, मुंबईसह उपनगर, ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
6/6
19-20 एप्रिल रोजी राज्यात पुन्हा हिटवेव आणि दुसरीकडे रिमझिम पावसाच्या सरी असं दोन्ही वातावरण पाहायला मिळू शकतं. सतत बदलत्या वातावरणामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी चिंतेत आहे, शिवाय रोगराई देखील वाढत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Report : महाराष्ट्रात इथं उष्णतेची लाट तर कुठे कोसळणार पाऊस, हवामान विभागाकडून स्पेशल अलर्ट