Weather update : महाराष्ट्राला Heat wave चा तडाखा; अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून उष्णतेचा रेडअलर्ट
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात 44 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात 44 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement
2/7
हवामान विभागानं महाराष्ट्रातील परभणी, नांदेड, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा, या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
3/7
दुसरीकडे बीड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव या जिल्ह्यांना देखील हवामाना विभागाकडून उष्णतेचा हायअलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 40 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
4/7
पुणे, सातारा, अहमदनगर, ठाणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये कमाल 32 ते 34 अंश सेल्सिअसदरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
कोकणामध्ये हवामान विभागाकडून उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये 30 ते 32 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
6/7
मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास आजही हवामान कोरड राहणार असून, आकाश निरभ्र राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान महाराष्ट्रात येत्या काळात तापमाना आणखी वाढ होण्याची शक्यात आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather update : महाराष्ट्राला Heat wave चा तडाखा; अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून उष्णतेचा रेडअलर्ट