Asia Cup मध्ये कुणालाच जमलं नाही, ते अभिषेकने करून दाखवलं, दिग्गजांच्या पक्तीत मिळवलं स्थान
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा याने आशिया कपमध्ये इतिहास रचला आहे.अभिषेक शर्माने आशिया कप 2025 मध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा याने आशिया कपमध्ये इतिहास रचला आहे.अभिषेक शर्माने आशिया कप 2025 मध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
advertisement
2/7
अभिषेक शर्माने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 22 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले होते. या दरम्यान त्याने 61 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने आशिया कपमध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
advertisement
3/7
अभिषेक शर्मा आशिया कप 2025 मध्ये 300 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला.त्याच्या खात्यात 309 धावा आहेत. या धावांच्या बळावर त्याने दिग्ग्ज खेळाडूंना मागे टाकले आहे.
advertisement
4/7
अभिषेकने आरोन फिंच, बाबर आझम आणि महेला जयवर्धने यांचे विक्रम मोडले आणि टी-२० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
advertisement
5/7
2018 मध्ये फिंचने एका टी20 स्पर्धेत 306 धावा केल्या, तर बाबरने 2021मध्ये 303 धावा केल्या आणि जयवर्धनेने 2010 मध्ये 320 धावा केल्या होत्या. या तीनही दिग्गजांना त्याने मागे सोडले आहे.
advertisement
6/7
या दिग्गजांना मागे सोडले असले तरी सर्वाधिक धावांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी आहे.विराटच्या धावांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी 10 धावा करण्याची आवश्यकता आहे.
advertisement
7/7
टी२० स्पर्धेत सर्वाधिक धावा ३१९ धावा - विराट कोहली (टी२० विश्वचषक २०१४), ३१७ धावा - तिलकरत्ने दिलशान (टी२० विश्वचषक २००९), ३०९ धावा - अभिषेक शर्मा (आशिया कप २०२५), ३०६ धावा - आरोन फिंच (झिम्बाब्वे टी२० त्रिकोणी मालिका २०१८), ३०३ धावा - बाबर आझम (टी२० विश्वचषक २०२१), ३०२ धावा - महेला जयवर्धने (टी२० विश्वचषक २०१०)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup मध्ये कुणालाच जमलं नाही, ते अभिषेकने करून दाखवलं, दिग्गजांच्या पक्तीत मिळवलं स्थान