IND vs NED : टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये भांडण, LIVE मॅचमध्ये वाद झाला,पण कुळालाच कळला नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये वाद झाला होता, पण हा वाद कुणालाच कळाला नाही आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँडचा 17 धावांनी पराभव केला आहे. या विजयानंतर आता टीम इंडिया थेट सूपर 8 मध्ये खेळणार आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाने नेदरलँड समोर 194 धावांचे धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड फक्त 176 धावांपर्यंत मजल मारू शकली होती. त्यामुळे टीम इंडियाने नेदरलँडचा 17 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
3/7
या सामन्यात टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये वाद झाला होता, पण हा वाद कुणालाच कळाला नाही आहे. त्याचं झालं असं की शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शिवम दुबे बाद झाल्यानंतर रिंकु सिंह फलंदाजीला आला होता.
advertisement
4/7
रिंकु सिंहने तिसरा बॉल खेळायला आला पण त्याला व्यवस्थित मारला न आल्याने एकही धाव काढता आली नाही.
advertisement
5/7
त्यानंतर रिंकु सिंहने चौथ्या बॉलवर गंगनचूंबी षटकार लगावला होता. त्यानंतर रिंकूला आणखी षचकार मारायचे होते पण पाचव्या बॉलवर मोठा ड्रामा झाला.
advertisement
6/7
पाचव्या बॉलवर रिंकु पुन्हा बॉल मारण्यात अपयशी ठरला आणि बॉल विकेटकिपरच्या हातात गेला.इतक्यात हार्दिक पांड्या क्रिज सोडून अर्ध्यावर आला होता.रिंकूला धाव घ्यायची नव्हती पण हार्दिक अर्ध्यावर आल्यामुळे त्याला ती धाव घ्यावी लागली.
advertisement
7/7
हार्दिकला शेवटची बॉल खेळण्याची संधी मिळाली पण तो कॅच आऊट झाला. खरं तर हार्दिक पांड्याच्या अशा वागण्यावरून आता त्यांच्यावर प्रचंड टीका होते आहे. कारण चांगल्या लईत असलेल्या रिंकूला त्याने जबरदस्ती नॉन स्ट्राईकला ढकललं.त्यामुळे शेवटच्या ओव्हरला हा ड्रामा झाला पण तो कुणालाच कळाला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NED : टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये भांडण, LIVE मॅचमध्ये वाद झाला,पण कुळालाच कळला नाही