Badlapur : शहराचं नाव बदलापूर कसं पडलं? नावामागची कहाणी माहितीय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहितीय का की बदलापूर या शहराचा इतिहास आहे. शिवाय त्याच्या नावाची देखील एक कहाणी आहे. जी फारच कमी लोकांना माहित आहे.
advertisement
1/7

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर सध्या देशभरात चर्चेत आहे. इथे चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचारामुळे येथील स्थानिकांनी आंदोलन केलं, ज्यामुळे तिथे घडलेल्या प्रकाराची देशाला आणि काही महत्वाच्या लोकांना दखल घ्यावी लागली, ज्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष गेलं.
advertisement
2/7
पण तुम्हाला माहितीय का की बदलापूर या शहराचा इतिहास आहे. शिवाय त्याच्या नावाची देखील एक कहाणी आहे. जी फारच कमी लोकांना माहित आहे.
advertisement
3/7
असे सांगितले जाते की महाराज्यांच्या काळात मराठे त्यांचे सैनिक हे आपले घोडे या ठिकाणी बदलायचे, ज्यामुळे त्याचं नाव बदलापूर पडलं. महाराज्यांच्या काळात बदलापूरला जास्त महत्त्व नव्हतं. या जागेला फक्त ते लहान-मोठ्या कामासाठी वापरायचे.
advertisement
4/7
तसे पाहाता बदलापूर जरी महत्त्वाचे ठिकाण नसले तरी त्याचा ही एक इतिहास आहे. येथे बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडल्या आहे आणि या घटनांची नोंद बखरींमध्ये केलेली आढळते.
advertisement
5/7
पेशवेकाळात बदलापूरपासून सुमारे सहा किलोमीटर लांब आणि बारवी नदीच्या जवळ असलेले चोण हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. काही पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये ‘मौजे बदलापूर उर्फ चोण’ असा उल्लेख आढळतो. सन 1738-39 च्या सुमारास रामचंद्र हरी पटवर्धन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ‘मुक्काम बदलापूर’ असे लिहिल्याचा उल्लेख आढळतो.
advertisement
6/7
साष्टीच्या बखरीत वसई मोहिमेच्या दरम्यान चिमाजीअप्पा बदलापूर येथे मुक्कामाला होते, असा उल्लेख ही आहे. असे सांगितले जाते की कळव्याचा पाणबुरुज जिंकताना डागलेल्या तोफांचा आवाज चिमाजीअप्पांनी ऐकला तेव्हा ते बदलापूर येथे मुक्कामाला होते.
advertisement
7/7
वसईच्या मोहिमेतून वाघोलीला जात असताना सरदार पिलाजीराव जाधवांचा मुक्काम बदलापूर येथे होता, अशी नोंद एका पत्रात आहे. दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पेशव्यांच्या सरदारांनी कॅप्टन गॉडार्ड आणि हॉर्टलेचा पराभव कुळगाव, बदलापूरच्या आसपास केला होता. कागदोपत्री पेशव्यांच्या काळात बदलापूरचे महत्त्व वाढायला सुरुवात झाली, असे दिसून येते.