TRENDING:

पुण्यामध्ये AI मुळे नोकरी जात आहे का? सरकारने गणित मांडून सगळंच सांगितलं

Last Updated:

राज्यात AIमुळे नोकऱ्या गेल्याची घटना नाही, असे ॲड. आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. पुण्यातील कपातही AIमुळे नव्हती, सरकारने आकडेवारी सादर केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार कपात होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर नवीन भरती न होता कॉन्ट्रॅक्टवर कामं सुरू झाली आहेत. AI मुळे खरंच नोकऱ्या जाणार का असा प्रश्न चक्क विधान परिषदेत विचारण्यात आला होता. यावर, राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले असून, राज्यात एआयमुळे नोकऱ्या गेल्याची कोणतीही घटना अद्याप समोर आलेली नाही, असं त्यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे.
News18
News18
advertisement

कर्मचारी कपातीवर सदस्यांकडून प्रश्न

विधान परिषदेतील सदस्यांनी, 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रमाणे राज्यातील इतर आघाडीच्या कंपन्यांनीसुद्धा कर्मचारी कपात केल्यास अनेक कुटुंबांचा रोजगार जाईल का?' असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने आकडेवारी सादर केली. सरकारने स्पष्ट केले की, राज्यात पुणे शहरातील सुमारे ४५ हजार कर्मचाऱ्यांपैकी ३७६ कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून कमी केले आहे. मात्र, ही कपात एआयमुळे केलेली नाही, असे संबंधित कंपनीने सरकारला कळवले आहे.

advertisement

कर्मचाऱ्यांसाठी दिलासा

मंत्री ॲड. फुंडकर यांनी दिलेले हे स्पष्टीकरण राज्यातील आयटी (IT) आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. एआयमुळे नोकऱ्यांवर संकट येईल, अशी भीती व्यक्त होत असताना, सरकारने विधान परिषदेत ही वस्तुस्थिती समोर आणली आहे. सध्या तरी महाराष्ट्रातील कर्मचारी कपातीचा थेट संबंध एआय तंत्रज्ञानाशी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर स्थिर, कांद्यामध्ये पुन्हा घसरण, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

AI वर फक्त खापर न फोडता स्कील्स वापरणे आणि AI चा वापर करून अपडेट होणं गरजेचं आहे. नाहीतर AI ऐवजी स्कील्सची कमतरता असल्याने नोकरी किंवा खुर्ची धोक्यात येऊ शकते हे मात्र नक्की. आपले स्कील्स वापरून AI च्या मदतीनं उलट वेगानं काम पूर्ण करता येऊ शकतं. कामाची गुणवत्ता अधिक सुधारण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. AI मुळे नोकऱ्या गेल्या नाहीत हे विधिमंडळात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यामध्ये AI मुळे नोकरी जात आहे का? सरकारने गणित मांडून सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल