पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात तळवडे ते चन्होलीपर्यंत सुमारे २०.६ किलोमीटर लांबीची इंद्रायणी नदी आहे. या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे असून, वर्षभर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, विविध शहरे, गावे आणि औद्योगिक परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे, ज्यामुळे प्रशासनाने नदीत स्नान करण्यास मनाई केली आहे.
advertisement
पीएमपी'मधून उतरत होती तरुणी; चालकाने केला दरवाजा बंद अन्...पुण्यातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
नदीतील वाढते प्रदूषण आणि पूर नियंत्रण हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या निविदेमध्ये प्रामुख्याने प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण, दोन ठिकाणी ६० एमएलडी क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रांची (STP) उभारणी आणि नदीकाठचे सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचा विकास आराखडा तयार आहे. या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता झाली असून, कंत्राटदारांना १८ डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
