TRENDING:

Pimpri Chinchwad: जीवनदायिनी झाली विष वाहिनी! पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी, पवना अन् इंद्रायणी...

Last Updated:

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमधील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या नद्या प्रदुषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. याबाबत धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या जीवनदायिनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांमध्ये प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शहरातील नाले, तसेच उद्योगांचे रसायनयुक्त सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळत असल्याची कबुली खुद्द महापालिकेच्या पर्यावरण अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदवला गेला आहे. तरीदेखील नद्यांच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
Pimpri Chinchwad: जीवनदायिनी झाली विष वाहिनी! पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी, पवना अन् इंद्रायणी...
Pimpri Chinchwad: जीवनदायिनी झाली विष वाहिनी! पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी, पवना अन् इंद्रायणी...
advertisement

नदी शुद्धीकरणासाठी प्रभावी उपाययोजनाची गरज

पवना नदीची लांबी 24.4 किमी, इंद्रायणी 20.6 किमी आणि मुळा नदीची लांबी 12.4 किमी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने पवना नदीवर 25, इंद्रायणीवर 12, तर मुळा नदीवर 10 ठिकाणी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाण्याची तपासणी केली. तपासणीत नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खालावत असल्याचे आढळले आहे. रसायनांचे प्रमाण वाढणे, नाल्यांचे सांडपाणी मिसळणे आणि औद्योगिक उत्सर्जन हे मुख्य कारणीभूत घटक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

advertisement

Pimpri Chinchwad: 19 लाख वाहने अन् प्रदूषित नद्या, पिंपरी चिंचवडला प्रदूषणाचा विळखा, धक्कादायक अहवाल समोर

View More

काय आहे निष्कर्ष?

ऋतुमानानुसार करण्यात आलेल्या तपासणीत पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले. पवनामध्ये मिळणारे नाले आणि त्यातील प्रदूषित सांडपाणी हे प्रमुख कारण असल्याचे अहवालात नमूद आहे. त्याखालोखाल इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात असून ती औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने रसायनांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले.

advertisement

शुद्धीकरणावर भर द्यावा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी झोपेतून उठल्यानंतर खा ही 5 फळे, आरोग्याला होईल फायदा, तज्ज्ञांचा सल्ला
सर्व पहा

प्रक्रिया न झालेले सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी शहरातील नद्यांमध्ये थेट सोडले जात आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यास प्राधान्य देण्याऐवजी महापालिकेने नदी सुशोभीकरणाचा घाट घातला आहे. या दुर्लक्षामुळे नद्यांची ‘गटारगंगा’ होऊ लागली आहे. नद्यांना तातडीने पुनरुज्जीवन द्यावे, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ धनंजय शेंडबाळे यांनी केली.

मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Chinchwad: जीवनदायिनी झाली विष वाहिनी! पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी, पवना अन् इंद्रायणी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल