कशी घडली घटना?
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे आज दुपारी साडेतीन वाजता शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही मुले शेतमजूर कुटुंबातील आहेत. श्रद्धा काळू नवले (वय 13) सायली काळू नवले (वय 11) दीपक दत्ता (वय- 7 राहणार- कान्हेवाडी राजगुरुनगर) राधिका नितीन केदारी (वय -14 राहणार कानेवाडी राजगुरुनगर)अशी मृत मुलांची नावे आहेत. श्रद्धा आणि सायलीही दोन्ही मुले गोरक्षनाथ बबन कवठे (राहणार जवळे बाळेश्वर संगमनेर जिल्हा नगर) यांनी दत्तक घेतली होती.
advertisement
शवविच्छेदनासाठी मृतदेह मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी हृदयद्रावक आक्रोश केला. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रेय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात बुडालेल्या मृतात 3 मुलींचा व 1 मुलाचा समावेश आहे. शेततळ्याशेजारी खेळता खेळता ही मुले शेत तळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह मंचर ग्रामीण रूग्णालयात येथे दाखल केले आहे. या घटनेमुळे आदिवासी शेत मजूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
वाचा - इंदापूर-प्रवरानंतर आता वेंगुर्ल्यात बोट पलटली; 4 जण बेपत्ता
परिसरात हळहळ
कवठे हे शेतमजुरीचे काम करत आहेत. ही दोन्ही भावंडे निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय शिक्षण घेत होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्याजवळ खेळत होती. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठे त्यांची पत्नी ज्योती तातडीने शेततळ्याजवळ गेले. पण तोपर्यंत मुलांची प्राणज्योत मालवली होती. देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे यांनी भीमाशंकर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चारही मुलांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.
