महत्त्वाच्या 3 टप्प्यांमध्ये महामार्ग प्रकल्पाचे काम
महामार्ग प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम आधीच सुरू आहे, ज्यात पुणे-शिरूर उड्डाणपुलाचा समावेश आहे. या पुलामुळे पुणे–अहमदनगर महामार्गावरील कोंडी बर्यापैकी कमी होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात नव्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा विकास होणार आहे, ज्यात शिरूर ते संभाजीनगरचा मार्ग तयार केला जाणार आहे. तिसरा टप्पा हा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. यात शिरूर ते संभाजीनगरपर्यंतचा सहा-पदरी आधुनिक मार्ग आणि महत्त्वाच्या शहरांना, MIDC क्षेत्रांना तसेच औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे बायपास मार्ग तयार केले जाणार आहेत. यामुळे प्रवास जलद होईल आणि मालवाहतूकही सोपी होईल.
advertisement
MHADA Lottery 2025: अर्ज करा अन् घर मिळवा, म्हाडाची मुंबईकरांसाठी भन्नाट योजना, लॉटरीशिवाय मिळणार घर
मराठवाड्यातील विकासाला नवा वेग
हा महामार्ग राज्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील व्यापार, पर्यटन आणि उद्योगांना नवा वेग मिळणार आहे. बीड, औरंगाबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांत गुंतवणुकीसाठी नवीन संधी उघडतील. या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, काम देखील लवकरच सुरू होणार आहे. प्रकल्पासाठी अंदाजे 22 कोटींचा खर्च येणार आहे. सध्या 8-9 तासांचा खडतर प्रवास आता फक्त 3 तासांत साध्य होणार आहे.
या प्रकल्पातील दुसरा आणि तिसरा टप्पा सहा-पदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. आधुनिक डिझाइन, सुरक्षितता मानके आणि जलद वाहतुकीला लक्षात घेऊन हा मार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पामुळे दळणवळण अधिक सुरळीत होईल, उद्योग, पर्यटन आणि लॉजिस्टिक नेटवर्क मजबूत होण्यास मदत होणार आहे. संभाजीनगरच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. तसेच पुणे–मराठवाडा–विदर्भ या क्षेत्रातील संपर्क आणखी जलद आणि सोपा होणार आहे.






