रवींद्र पवार, संदीप देशमुख आणि संतोष पाषाणकर यांनी 24 ऑक्टोबर रोजी पुण्यातून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन प्रवासास सुरुवात केली. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान डोंगराळ रस्ते, तीव्र वळणे, मुसळधार पाऊस, दाट धुके आणि दुर्गम भागातील अतिशय खराब रस्ते अशा आव्हानांचा सामना करत या तिन्ही तरुणांनी हा प्रवास दुचाकीवरून पूर्ण केला.
advertisement
Success Story : नोकरी सोडली, चहा विकला, आता निलेश बनला रेस्टॉरंटचा मालक, वर्षाला 80 लाखांची उलाढाल
यावेळी तिन्ही तरुणांनी सांगितले की, भारतातील विविध राज्यातील स्थानिक संस्कृती, खाद्यपरंपरा, सण उत्सव अनुभव घेण्यासाठी हा प्रवास करण्याचा आम्ही निर्णय घेतला. विविध राज्यांची संस्कृती आणि निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहताना भारत देश किती विविधतेने नटलेला आहे, याचे दर्शन झाले.
या प्रवासात त्यांनी अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि सिक्कीम अशा दुर्गम आणि निसर्गरम्य राज्यांचा समावेश असलेला प्रदीर्घ मार्ग पार केला. डोंगराळ रस्ते, तीव्र वळणे, सतत बदलणारे हवामान, मुसळधार पाऊस, दाट धुके आणि काही ठिकाणी अतिशय खराब रस्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत या तिन्ही तरुणांनी हा प्रवास पूर्ण केला.
तब्बल 43 दिवसांचा 9 हजार 820 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून तिघेही 5 नोव्हेंबर रोजी पुण्यात दाखल झाले. हा प्रवास त्यांचा आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरला असून, भविष्यात आणखी अशी साहसी मोहीम राबवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.





