मूग अर्पणाची धार्मिक पार्श्वभूमी
पुराणकथांनुसार भगवान शंकर हे ‘हरितप्रिय’ आहेत, म्हणजेच हिरव्या रंगाच्या वस्तू त्यांना विशेष प्रिय आहेत. त्यामुळे बिल्वपत्र, मूग यांसारख्या हिरव्या वस्तूंचे अर्पण महत्त्वाचे मानले जाते. मूग अर्पण केल्याने कर्जमुक्ती मिळते, घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि आरोग्य, समाधान व समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.
अंबाबाई भक्तांपासून दुरावणार! इतके दिवस मूळ मूर्तीचं दर्शन बंद
advertisement
कृषीशी जोडलेला संबंध
श्रावण हा काळ कडधान्यांच्या पिकांच्या परिपक्वतेचा असतो. याच वेळी शेतांमध्ये मुगाची झाडे हिरवीगार दिसतात. पूर्वीच्या कृषिप्रधान समाजात, नवीन हंगामातील पीक सर्वप्रथम देवाला अर्पण करण्याची परंपरा होती. यामागे पीकसमृद्धीची प्रार्थना आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतू होता.
मूग अर्पणाच्या प्रथेमध्ये केवळ धार्मिकता नाही तर पोषणमूल्यांचाही संदेश आहे. मूग हे प्रथिनयुक्त, पचायला सोपे आणि आरोग्यदायी अन्न आहे. म्हणूनच, अर्पणानंतर मुगाचे प्रसादरूप सेवन आरोग्य वृद्धिंगत करण्यास मदत करते.