लग्नामध्ये गोंधळ का घातला जातो?
पूर्वजांपासून लग्नकार्याच्या प्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. आपले आराध्य दैवत तुळजापूरची जगदंबा भवानी हे प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहे आणि लग्न कार्यानिमित्ताने आपल्याकडे भवानी मातेचा गोंधळ घातलाच जातो.कारण घरातील शुभ कार्यप्रसंगी आराध्य देवतेला आमंत्रित करणे आणि हिरव्या मांडवामध्ये भवानी मातेचा जागरण गोंधळ करणे महत्वाचं असतं, असे कानडे सांगतात.
advertisement
हिंदू विवाहानंतर का करतात परळ विधी? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
अशी सुरू झाली परंपरा
घरात लग्नकार्य असताना सर्व रीती कामे निर्विघ्नपणे पार पडवीत म्हणून देवीला घरच्या शुभकार्यात सहभागी होण्याचं आवाहन करायचं असतं. जागरण गोंधळ च्या माध्यमातून भवानी मातेला विनंती केली जाते. की आई जगदंबा भवानी आमच्या घरी गोंधळाला ये आणि तुझ्या भोळ्या भक्तावरचे संकट दूर कर, असे कानडे सांगतात.
तसेच पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल नव्हते, कोणते मनोरंजनाचे साधन नव्हती. ग्रामीण भागात एखाद्या घरी लग्न असलं की सर्व नातेवाईक जमा व्हायचे. मग मनोरंजनासाठी अंगणामध्ये देवीचा गोंधळ घातला जायचा. हिरव्या मांडवामध्ये एकीकडे हळद लावण्याचा कार्यक्रम चालायचा. त्याच्यामध्ये पाहुणेमंडळीची मनोरंजनही व्हायचं आणि सर्वांची रात्र हसत खेळण्यांमध्ये निघून जायची, असेही ते सांगतात.
लग्नात मंगलाष्टके किती असावीत? का गायली जातात? पाहा खरं कारण Video
विदर्भात आणि मराठवाड्यात कधी घालतात गोंधळ?
जसं विदर्भामध्ये लग्नाच्या नंतर सत्यनारायण केला जातो. सत्यनारायणाची पूजा पाठ केली जाते. तर मराठवाड्यामध्ये वर वधू एका ठिकाणी आल्याच्या नंतर गोंधळाची पूजा मांडणी करून देवीचा गोंधळ घालून तेल जाळण्याची परंपरा आहे. विदर्भामध्ये हळदीच्या दिवशी वधू किंवा वराच्या हाताने त्यांच्या लग्नघरी तेल जाळले जाते. अशाप्रकारे ही देवीचा, खंडोबाचा गोंधळ घालण्याची परंपरा चालत आली आहे, अशी माहिती गोंधळी राजीव कानडे यांनी दिली.





