TRENDING:

Religious: अगरबत्ती की धूपकांडी? पूजा करताना कशाचा वापर करणं अधिक शुभ; शास्त्र काय सांगतं?

Last Updated:

Religious Tips: पूजेदरम्यान वातावरण शुद्ध आणि मंगलमय करण्यासाठी लोक अगरबत्ती किंवा धूपकांड्या वापरतात. परंतु काहीवेळा असा प्रश्न पडतो की, शास्त्रांनुसार कोणता पर्याय योग्य आहे: अगरबत्ती की धूपकांडी? याचे उत्तर आणि कारण जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पूजा पाठामध्ये दिवा, समई, अगरबत्ती या गोष्टी नसतील तर ती पूजा पूर्ण वाटत नाही. पूजेसाठी काही ठराविर गोष्टी या महत्त्वाच्या मानल्या जातात. भारतीय संस्कृतीत पूजेला विशेष महत्त्व आहे. पूजेदरम्यान वातावरण शुद्ध आणि मंगलमय करण्यासाठी लोक अगरबत्ती किंवा धूपकांड्या वापरतात. परंतु काहीवेळा असा प्रश्न पडतो की, शास्त्रांनुसार कोणता पर्याय योग्य आहे: अगरबत्ती की धूपकांडी? याचे उत्तर आणि कारण जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

धूपकांडी आणि अगरबत्तीमधील फरक -

धूपकांडी: धूपकांडीमध्ये लाकडाचा वापर केलेला नसतो. धूपकांड्या साधारणपणे डिंक, लाकूड पावडर, औषधी वनस्पती आणि नैसर्गिक सुगंधी पदार्थांपासून बनवल्या जातात. जाळल्यावर त्यातून जास्त धूर निर्माण होतो ज्यामुळे वातावरण शुद्ध होते.

अगरबत्ती: पातळ लाकडी काडीवर सुगंधी पावडर लेप करून या बनवल्या जातात. जाळल्यावर त्या सौम्य सुगंध आणि कमी धूर निर्माण करतात.

advertisement

याबाबत शास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मग्रंथांनुसार, वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजेदरम्यान नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या गोष्टींचा वापर करणे सर्वोत्तम मानले जाते.

धूपाचे महत्त्व: अग्नीला धूप अर्पण केल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. देवतांना ते आवडते आणि यज्ञासारखे वातावरण शुद्ध करते.

उदबत्तीच्या काड्यांचा संदर्भ: आधुनिक काळात उदबत्तीच्या काड्या वापरणं फार कॉमन झालंय. पम शास्त्रांमध्ये त्यांचा थेट उल्लेख नाही. त्यांना मंद सुगंधासाठी वापरले जाऊ शकते.

advertisement

धूपकांड्या का वापराव्यात?

नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असल्याने त्याचा वापर योग्य ठरतो, त्यामध्ये डिंक, कापूर, चंदन आणि औषधी वनस्पती असतात, त्यानं वातावरण शुद्ध होतं. शास्त्रांमध्ये धूप देवांना अर्पण केले जाते. त्याचा धूर नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मकता वाढवतो.

मागं तसं पुढं, यंदाही झोळी रिकामीच! वर्ष 2026 दोन राशीच्या लोकांना त्रासाचे

advertisement

उदबत्तीच्या काड्या कधी वापरायच्या?

तुम्हाला सौम्य सुगंध हवा असेल आणि धूपाचा धूर जड-जास्त वाटत असेल तर उदबत्तीचा वापर करता येतो. त्या हाताळायला सोयीस्कर असतात आणि लवकर जळतात.

आरोग्य आणि खबरदारी - धूप काड्या भरपूर धूर निर्माण करतात, त्या चांगल्या हवेशीर जागेत जाळा. अगरबत्ती निवडताना त्या रसायनांच्या नसल्याची खात्री करा. नैसर्गिक सुगंध असलेल्या अगरबत्ती निवडा.

advertisement

शास्त्रांनुसार, पूजेदरम्यान धूपकांड्यांचा वापर शुभ मानला जातो, त्यानं वातावरण शुद्ध होते, देवतांनाही प्रिय असतात. आधुनिक सोयीसाठी अगरबत्तीचा वापर केला जाऊ शकतो, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून, धूपबत्तीला जास्त महत्त्व आहे. पुढच्या वेळी पूजा करताना आपण योग्य तो निर्णय घ्यावा.

वर्षातील शेवटच्या पौर्णिमेपासून या राशींचा चांगला काळ सुरू; धनलक्ष्मीचा आशीर्वाद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये पाठवायचं कसं? कांद्याचा भाव कोसळला, शेतकऱ्याची व्यथा
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Religious: अगरबत्ती की धूपकांडी? पूजा करताना कशाचा वापर करणं अधिक शुभ; शास्त्र काय सांगतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल