मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रात यासंबंधीत एक गोष्ट सांगितली आहे.जेव्हा 24 सप्टेंबर 1999 अर्जून तेंडुलकरचा जन्म झाला होता तेव्हा त्याला मी (सचिन)
घराबाहेर पडलेल अजिबात आडवायचं नाही.अर्जुन इतका रागावायचा की तो सचिनशी फोनवर बोलायचाच नाही. हे 6 वर्षे चालू राहिले. सचिनला अर्जुनकडून फोनवर हॅलो ऐकण्याची इच्छा होती. पण ती इच्छा इच्छाच राहायची.
advertisement
या घटनेवर सचिन तेंडुलकर लिहतो,मुलांना मोठे होताना पाहणे ही एक अद्भुत भावना असते आणि जेव्हा जेव्हा मी त्यांच्यापासून दूर असेन तेव्हा मला त्यांची खूप आठवण यायची.अर्जुनसोबत ते आणखी कठीण होते. मी गेल्यावर त्याला खूप वाईट वाटायचे आणि तो माझ्याशी फोनवर बोलण्यास नकार द्यायचा.
'माझ्या आयुष्याच्या पहिल्या सहा वर्षात, मी टूरवर असताना अर्जुन माझ्याशी कधीच बोलला नाही.त्याचा आवाज ऐकण्यासाठी मी अनेकदा अंजलीला त्याला नमस्कार करायला सांगायचो, पण तो नेहमीच नकार द्यायचा. मग मी परतल्यावर, तो पहिले तीन दिवस माझ्याशी चिकटून राहिला,असे सचिनने सांगितले.
जेव्हा माझी मुले होती, तेव्हा तंत्रज्ञान आजच्याइतके प्रगत नव्हते आणि स्काईप किंवा फेसटाइमचा पर्यायही नव्हता. जर तंत्रज्ञान उपलब्ध असते, तर मी अंजलीला सारा आणि अर्जुनला वेबकॅमसमोर आणण्यास सांगितले असते जेणेकरून मी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असताना माझ्या मुलांना किमान पाहू शकेन. अशा प्रकारे मी त्यांच्यातील इतके बदल गमावले नसते, असे सचिन सांगतो.