TRENDING:

IND vs ENG : हकालपट्टी झाली; तरी सुधारला नाही इरफान पठाण, गिलच्या विजयानंतरही विराटवर काढला 'राग'!

Last Updated:

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 6 रननी थरारक विजय झाला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-2 ने ड्रॉ करून संपवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 6 रननी थरारक विजय झाला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-2 ने ड्रॉ करून संपवली आहे. ओव्हलमध्ये खेळवल्या गेलेल्या या टेस्टच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 रनची गरज होती, तर भारताला 4 विकेट हव्या होत्या. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर एका तासामध्येच मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी इंग्लंडचा ऑलआऊट केला आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
हकालपट्टी झाली; तरी सुधारला नाही इरफान पठाण, गिलच्या विजयानंतरही विराटवर काढला 'राग'!
हकालपट्टी झाली; तरी सुधारला नाही इरफान पठाण, गिलच्या विजयानंतरही विराटवर काढला 'राग'!
advertisement

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामधला टीम इंडियाचा हा सगळ्यात कमी रननी झालेला विजय आहे. मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराजने 5 विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाला 4 आणि आकाश दीपला 1 विकेट घेण्यात यश आलं. या विजयासोबतच टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचची सीरिज 2-2 ने बरोबरीमध्ये सोडवली आहे.

advertisement

इरफानची पोस्ट, विराटवर निशाणा

टीम इंडियाच्या या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने वादग्रस्त पोस्ट केली आहे. इरफानच्या या पोस्टवरून चाहते त्याने विराट कोहलीवर निशाणा साधल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. 'या सीरिजने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, क्रिकेट कुणासाठीही थांबत नाही', असं इरफान पठाण म्हणाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजआधी विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. इरफानने यावरूनच विराटवर निशाणा साधल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

advertisement

कॉमेंट्री बॉक्समधून पठाणची हकालपट्टी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीवेळीही इरफान पठाणने विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती, त्यानंतर आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून इरफान पठाणची हकालपट्टी केली गेली. विराटवर टीका केल्यामुळे इरफानला कॉमेंट्री बॉक्समधून डच्चू मिळाल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या.

advertisement

काय म्हणाला होता इरफान?

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवेळी इरफान पठाणने विराटच्या कामगिरीवर टीका केली होती. विराट कोहलीने घरगुती क्रिकेटमध्ये शेवटचा सामना एक दशकापुर्वी खेळला होता. त्यामुळे असे खेळाडू संघात हवेत का? याचा आता विचार करायला हवा. एखाद्या युवा खेळाडूला संधी दिल्यास तो देखील 25-30ची सरासरी देऊ शकतो,असे मत त्याने काँमेंट्री करताना मांडले होते.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : हकालपट्टी झाली; तरी सुधारला नाही इरफान पठाण, गिलच्या विजयानंतरही विराटवर काढला 'राग'!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल