TRENDING:

आशिया कप जिंकताच BCCI ने उघडला खजिना, टीम इंडियावर पैशांचा पाऊस, केली मोठी घोषणा

Last Updated:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final: आशिया कपमध्ये पाकिस्तानवर भारताच्या दणदणीत विजयानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI टीम इंडियासाठी बक्षीस जाहीर केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ind vs Pak Asia Cup 2025 Final: आशिया कपमध्ये पाकिस्तानवर भारताच्या दणदणीत विजयानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI टीम इंडियासाठी बक्षीस जाहीर केलं आहे. BCCI ने टीम इंडियासाठी 21 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. ही सगळी रक्कम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये वाटली जाईल. BCCI ने त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट करत ही घोषणा केली. यावेळी बीसीसीआयने पाकिस्तानला चिमटे देखील काढले आहेत.
News18
News18
advertisement

BCCI ने आपल्या अधिकृत अकाऊंटवर लिहिलं की, "3 वार, 0 प्रतिसाद. आशिया कप चॅम्पियन. संदेश मिळाला आहे. संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी ₹२१ कोटींची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे."

रविवार, २८ सप्टेंबर रोजी दुबईतील दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप फायनलमध्ये भारताने ५ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी १४७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे त्यांनी २ चेंडू शिल्लक असताना साध्य केले. तिलक वर्माने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. तिलक वर्माला सामनावीर आणि अभिषेक शर्माला मालिकावीर पुरस्कार मिळाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

या अंतिम सामन्यात पाकिस्तानचे ओपनर बॅट्समन साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी ९.४ षटकांत ८४ धावांची मोठी भागीदारी केली. तथापि, ही भागीदारी तुटल्यानंतर, पाकिस्तानी संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. पूर्ण २० षटकंही खेळू शकला नाही. भारताकडून कुलदीप यादवने चार, तर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आशिया कप जिंकताच BCCI ने उघडला खजिना, टीम इंडियावर पैशांचा पाऊस, केली मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल