जयवर्धने कुणावर रागावला?
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने सामन्यानंतर म्हणाले, 'आम्ही त्या दोन कॅचमध्ये काही चुका केल्या पण खेळ असाच आहे. गेल्या सामन्यात नशिबाने आम्हाला साथ दिली होती, पण या सामन्यात काहीही चांगले झाले नाही'.
क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्जचा विजय
या सामन्यात पंजाब किंग्जच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली. पण मुंबई इंडियन्सचे खेळाडू या सामन्यात आपली छाप सोडू शकले नाहीत. मुंबई इंडियन्सने आपल्या बॅटिंगचे कौशल्य दाखवत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 203 रन केल्या. या आव्हानाचा पाठलाग पंजाब किंग्जने अवघ्या 19 ओव्हरमध्ये करून सामना जिंकला. पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 87 रनची स्फोटक खेळी केली आणि आपल्या टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement
श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सच्या एकाही बॉलरला सोडले नाही आणि सर्वांवर जोरदार हल्ला केला. आता आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यात हा अंतिम सामना खेळला जाईल. दरम्यान मुंबई इंडियन्स त्यांच्या कामगिरीवर खूप नाराज असतील. मुंबईने जर चांगली फिल्डिंग केली असती, तर कदाचित फायनलमध्ये मुंबईचा सामना आरसीबीविरुद्ध झाला असता.
इतिहास घडवण्यासाठी दोन्ही टीम तयार
आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांनी अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे आयपीएलला यंदाच्या मोसमात एक नवा चॅम्पियन मिळणार आहे.