काय म्हणाले कपिल देव?
गौतम गंभीरच्या कामाच्या पद्धतीवर भाष्य करताना कपिल देव म्हणाले की, सध्याच्या काळात 'कोच' हा शब्द अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. खरं तर गौतम गंभीर हा कोच असूच शकत नाही, तो केवळ टीमचा मॅनेजर असू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू आधीच परिपक्व असतात, त्यामुळे त्यांना तांत्रिक गोष्टी शिकवण्यापेक्षा त्यांचे मानसिक व्यवस्थापन करणं जास्त महत्त्वाचं असतं, असं कपिल देव म्हणाले आहेत.
advertisement
कपिल देव यांनी गंभीरचं माप काढलं?
गौतम एखादा लेग-स्पिनर किंवा विकेटकीपरला नवीन काही शिकवू शकत नाही, कारण ते आधीच त्यात पारंगत नसतो, असं म्हणत कपिल देव यांनी गंभीरचं माप काढलं का? असा सवाल विचारला जातोय. कपिल देव यांच्या या वक्तव्यानंतर आता क्रिडाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बीसीसीआय देखील याचा विचार करणार का? असा सवाल विचारला जात आहे. गंभीर अंथरुणाबाहेर हातपाय पसरतोय का? असा सवाल देखील विचारला जात आहे.
आत्मविश्वास निर्माण करणे हेच मुख्य काम
खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हेच मुख्य काम आहे. आपल्या स्वतःच्या नेतृत्वाचा अनुभव सांगताना त्यांनी नमूद केलं की, जो खेळाडू शतक ठोकतो त्याच्यासोबत डिनरला जाण्यापेक्षा, जो फॉर्ममध्ये नाही अशा खेळाडूसोबत वेळ घालवणं जास्त गरजेचं असतंय. टीम इंडियाचे भवितव्य हे खेळाडूंच्या मनोबलावर अवलंबून असते, असंही कपिल देव यांनी म्हटलं आहे.
