काय म्हणाला शार्दुल?
"मला वाटतं सुरुवातीपासूनच आमचा हाच प्लॅन होता. वैद्यकीय पथकाने खूप मेहनत घेतली आहे. वैद्यकीय पथकाचे खरं तर अभिनंदन... कारण ते पंतला पुन्हा मैदानावर आणू शकले असते. ऋषभ थोडा वेळ फलंदाजी करू शकला असता आणि त्याने ते करून दाखवलं. संघासाठी त्याने काढलेल्या धावा खूप महत्त्वाच्या होत्या", असं ऋषभ म्हणाला आहे.
advertisement
ऋषभला खूप वेदना होत होत्या - शार्दुल ठाकूर
ऋषभच्या वेदनांची कल्पना देत शार्दुल पुढे म्हणाला, "ऋषभला खूप वेदना होत होत्या. आम्ही त्याला अनेक उत्तम गोष्टी करताना पाहिले आहे आणि संघासाठी त्याने केलेली ही आणखी एक अद्भुत गोष्ट होती."
ऋषभच्या पायाला हात लावला अन्...
पंतने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय कसा घेतला, याबद्दल बोलताना शार्दुलने सांगितले, "हा त्याचा आणि वैद्यकीय संघाचा निर्णय होता. सकाळी आम्हाला वाटले की कदाचित तो फलंदाजी करू शकेल. पहिल्यांदा, मला त्याच्या पायाला स्पर्श करावा लागला आणि तो व्यवस्थित चालू शकतो की नाही ते पहावे लागले. जर तो व्यवस्थित चालू शकत असेल, तर आपण पुन्हा फलंदाजीबद्दल बोलू शकतो, असं आमचं ठरलं होतं", असंही शार्दुल ठाकूरने म्हटलं.
दरम्यान, ऋषभ पंतने दुखापत असूनही मैदानावर उतरून संघासाठी केलेल्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.