हार्दिक पांड्याने पुढाकार घेतला अन्...
नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच जिंकल्यानंतर आता आम्हाला खात्री पटली आहे की, या स्टेडियममध्ये कोणतीही समस्या नाही, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. मात्र, सुपर 8 मध्ये जेव्हा टीम इंडिया पहिली मॅच याच स्टेडियमवर हारली तेव्हा सर्वांना टेन्शन आलं होतं. पण टूर्नामेंटमधील टर्निंग पॉईंट हा साऊथ आफ्रिकेविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये मिळालेल्या धक्क्या नंतर आला. त्या कठीण प्रसंगानंतर सूर्याने टीमचा अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पांड्या याला पुढाकार घेण्यास सांगितलं. टीमला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी पांड्याचा अनुभव कामाला आला.
advertisement
बॅटिंग युनिटची एक बैठक बसली
टीम इंडियाच्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये बॅटिंग युनिटची एक बैठक झाली. हार्दिक पांड्याने ही बैठक लीड केली. सूर्यकुमार यादव देखील त्याच्यासोबत होता. पण पांड्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना बॅक टू बेसिक जाण्यास सांगितलं. टीम इंडियाचा साऊथ अफ्रिकाविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे पांड्याने बैठकीत काही मुद्दे मांडले अन् पुढच्याच सामन्यात टीम इंडियाने विजयाचा पताका फडकवला. त्यावर सूर्याने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खुलासा केला आहे.
हार्दिक पांड्याविरुद्ध पुण्यात तक्रार
दरम्यान, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या जोरदार ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. पांड्याने सगळं नीट केलं पण फायनल जिंकल्यानंतर माती खाल्ली. मॅच झाल्यानंतर पांड्या गर्लफ्रेंड माहिकासोबत नको ते कृत्य करताना दिसला. त्यामुळे आता हार्दिक पांड्यावर पुण्यात तक्रार देखील दाखल केली गेली आहे. जग खपवून घेईन पण तिरंग्याचा अपमान पुणेकर खपवून घेणार नाही, याची प्रचिती पुन्हा पहायला मिळाली. पुण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पांड्याला मुंबई विमानतळावर पाहिले गेले आणि मीडिया रिपोर्टनुसार, पांड्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत माहिका शर्मासोबत स्वित्झर्लंडला गेला आहे.
