TRENDING:

IND vs PAK : सगळे म्हणाले Boycott करा, पण सूर्याने मन जिंकलं; पाकिस्तानच्या समोर नाकावर टिच्चून म्हणला 'पहालगाम हल्ल्यात...'

Last Updated:

SuryaKumar Yadav On pahalgam attack : आम्ही इथे केवळ क्रिकेट खेळण्यासाठी आलो होतो आणि आमच्या विजयानेच आम्ही त्यांना योग्य उत्तर दिले आहे, असं सूर्यकुमार यादव सामन्यानंतर म्हणाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
SuryaKumar Yadav On refuse hand shake : दुबईमध्ये झालेल्या आशिया कप मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला नमवून भारतीय टीमने एक शानदार विजय मिळवला. हा विजय केवळ मैदानावरचा नव्हता, तर देशाच्या भावनांशी जोडलेला होता. मॅच संपल्यानंतर एक वेगळाच आणि अनपेक्षित प्रसंग घडला. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं नाही. क्रिकेटच्या मैदानावर विजयानंतर नेहमी दिसणारे खेळाडूंच्या हस्तांदोलनाचे दृश्य यावेळी दिसले नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. या मॅचच्या निकालानंतर बोलताना सूर्यकुमार यादवने यामागचे कारण स्पष्ट केलं, जे ऐकून अनेकांना अभिमान वाटला.
SuryaKumar Yadav On pahalgam attack
SuryaKumar Yadav On pahalgam attack
advertisement

निर्णय वैयक्तिक नसून टीमचा - सूर्या

सूर्यकुमार यादव म्हणाला, "आम्ही इथे केवळ क्रिकेट खेळण्यासाठी आलो होतो आणि आमच्या विजयानेच आम्ही त्यांना योग्य उत्तर दिले आहे. मैदानावरचे आमचे वर्तन हे बीसीसीआय आणि सरकारसोबत असलेल्या आमच्या भूमिकेशी जुळणारे आहे." यादवच्या या वक्तव्याने हे स्पष्ट होते की, हा निर्णय वैयक्तिक नसून टीमचा आणि देशाच्या भावनांचा आदर करणारा होता.

advertisement

पहलगाम हल्ल्याला कडक प्रत्युत्तर

हा निर्णय अलीकडेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. बीसीसीआय आणि सरकारने मॅच खेळायला परवानगी दिली असली तरी, खेळाडूंच्या मनात देशाबद्दल आणि पीडित कुटुंबांबद्दल आदर होता. म्हणूनच, मॅच जिंकल्यानंतरही टीमने जास्त जल्लोष केला नाही. खेळाडूंनी मॅचच्या निकालाला शांतपणे स्वीकारले, जे त्यांच्या व्यावसायिक भूमिकेचे प्रतीक होतं.

advertisement

मैदानावरचा तणाव

दरम्यान, हा प्रसंग दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण बनला आहे. पूर्वीच्या मॅचमध्ये खेळाडूंचे मैदानावरचे संबंध सौहार्दपूर्ण होते, अनेकदा ते एकमेकांशी हस्तांदोलन करताना किंवा बोलताना दिसायचे. मात्र, यावेळी मैदानावरचा तणाव स्पष्टपणे दिसून आला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : सगळे म्हणाले Boycott करा, पण सूर्याने मन जिंकलं; पाकिस्तानच्या समोर नाकावर टिच्चून म्हणला 'पहालगाम हल्ल्यात...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल