जितेश शर्माने यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमधून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक केलं होतं. ऑस्ट्रेलिया आणि मग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये जितेश शर्मा स्पेशलिस्ट विकेट कीपर म्हणून खेळला तर संजू सॅमसनला टीमबाहेर बसावं लागलं.
मागच्या 2 टी-20 सीरिजमध्ये जितेश शर्माला 5 सामन्यांमध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 39 बॉलचा सामना करून 62 रन केले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 159 चा होता. हे आकडे साधारण वाटत असले तरी जितेशने या पाचही इनिंगमध्ये सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर बॅटिंग केली आणि स्वत:चं टॅलेंट दाखवून दिलं.
advertisement
आपण फक्त मिडल ऑर्डरच नाही तर फिनिशरची भूमिकाही पार पाडू शकतो, हे जितेशने सिद्ध केलं. याशिवाय जितेशकडे विकेट कीपिंगचं उत्कृष्ट कौशल्यही आहे, पण तरीही त्याची टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड झाली नाही, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
जितेशची निवड का झाली नाही?
निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी जितेश शर्माची निवड का झाली नाही? याचं कारण सांगितलं आहे. टीम मॅनेजमेंटला टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा विकेट कीपर हवा होता, त्यामुळे संजू सॅमसनसोबत इशान किशनची निवड झाली आहे. जितेश शर्माने काही चूक केली नाही, पण टीम कॉम्बिनेशनची निवड करताना जितेशला बाहेर जावं लागलं आहे, असं अजित आगरकर म्हणाला आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेट कीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, हर्षित राणा
