TRENDING:

हार्दिक पांड्या चुकीचा नव्हता! Tilak Varma ला रिटायर्ड आऊट करण्यामागचं खरं कारण समोर, Mumbai Indians ने का लपवली ही महत्त्वाची गोष्ट?

Last Updated:

Tilak Varma Retire Out Reason : हार्दिक पांड्याने तिलक वर्माला अतितटीच्या वेळी रिटायर्ड हर्ड आऊट होण्यास सांगितल्यानंतर मोठा वाद पेटला होता. त्यावर आता खरं कारण समोर आलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Tilak varma Finger niggle Retire out : शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला आक्रमक फलंदाजी करता आली नाही अन् मुंबईला पराभवाचं तोंड पहावं लागलं. मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा खापर हार्दिक पांड्याच्या डोक्यावर फोडण्यात आलं. हार्दिक पांड्याने तिलक वर्माला रिटायर्ड हर्ट घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पांड्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, त्याचं खरं कारण आता समोर आलं आहे.
Tilak varma Finger niggle Retire out
Tilak varma Finger niggle Retire out
advertisement

तिलक वर्मा रिटायर्ड आऊट का झाला?

"पांड्याचा कठोर वाटणारा निर्णय केवळ त्याच्या बोटातील दुखापतीमुळे घेण्यात आला होता. त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. म्हणूनच त्याला पुन्हा डगआउटमध्ये बोलावण्यात आलं. दुखापतीमुळे तो पॉवरने हिटिंग करु शकत नव्हता. हेच कारण आहे की तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. तिलकच्या फटके मारण्याच्या क्षमतेवर संघात शंका नाही," असं एका सूत्राने शनिवारी TOI ला सांगितलं.

advertisement

नेमकं काय झालं होतं? 

सामन्याच्या 19 व्या ओव्हरमध्ये मुंबई संघाने तिलक वर्माला रिटायर करण्याचा निर्णय घेतला पण त्याचा संघाला फायदा झाला नाही. तिलकने 23 चेंडूत 25 धावा केल्या. 19 व्या ओव्हरमध्ये पहिल्या पाच चेंडूत शार्दुलने फक्त पाच धावा दिल्या, त्यानंतर मुंबई संघाने तिलक वर्माला रिटायर करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला 22 धावांची आवश्यकता होती. मात्र, पांड्याला मुंबईला विजय मिळवून देता आला नाही.

advertisement

खरं कारण का सांगितलं नाही?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

दरम्यान, आम्हाला सामना जिंकण्यासाठी काही मोठ्या हिट्सची गरज होती, त्याला ते मिळत नव्हतं. क्रिकेटमध्ये असे काही दिवस येतात जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण ते मिळत नाहीत. चांगले क्रिकेट खेळा, मला ते सोपं ठेवायला आवडतं. चांगले निर्णय घे तर काम सोपं होतं, असं हार्दिक पांड्या म्हणाला होता. मात्र, मुंबईने तिलकच्या दुखापतीचं खरं कारण का सांगितलं नाही? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हार्दिक पांड्या चुकीचा नव्हता! Tilak Varma ला रिटायर्ड आऊट करण्यामागचं खरं कारण समोर, Mumbai Indians ने का लपवली ही महत्त्वाची गोष्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल