TRENDING:

Team India : हवा वैभव-आयुषची, पण दम दाखवून गेला विहान... टीम इंडियाला संकटातून बाहेर काढणारा नवा हिरा!

Last Updated:

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 352 रनचा डोंगर उभारला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलावायो : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 352 रनचा डोंगर उभारला आहे. विहान मल्होत्राचं नाबाद शतक, तसंच वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंडूच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. विहान मल्होत्राने 107 बॉलमध्ये नाबाद 109 रन केले, ज्यात 7 फोरचा समावेश होता. याशिवाय वैभव सूर्यवंशीने 30 बॉलमध्ये 52 रनची आक्रमक खेळी केली. वैभवने त्याच्या इनिंगमध्ये 4 फोर आणि 4 सिक्स मारले. याशिवाय अभिज्ञान कुंडूने 62 बॉलमध्ये 5 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 61 रन केले.
हवा वैभव-आयुषची, पण दम दाखवून गेला विहान... टीम इंडियाला संकटातून बाहेर काढणारा नवा हिरा!
हवा वैभव-आयुषची, पण दम दाखवून गेला विहान... टीम इंडियाला संकटातून बाहेर काढणारा नवा हिरा!
advertisement

अंडर-19 वर्ल्ड कपच्या या सामन्यात झिम्बाब्वेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर वैभव सूर्यवंशीने सुरूवातीपासूनच आक्रमक बॅटिंग करायला सुरूवात केली. वैभवला टीमच्या इतर खेळाडूंनीही साथ दिली, पण टॉप-ऑर्डरला मोठा स्कोअर करता आला नाही. अखेर पाचव्या क्रमांकावर आलेल्या विहान मल्होत्राने शतक ठोकलं. विहानला अभिज्ञान कुंडूनेही चांगली साथ दिली. विहान आणि अभिज्ञान यांच्यात मोठी पार्टनरशीप झाली नसती, तर या सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली असती.

advertisement

वैभव-आयुषसाठी सोडली बॅटिंग पोजिशन

विहान मल्होत्रा हा वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासोबत ज्युनियर-लेव्हल क्रिकेट खेळत आहे. विहान मल्होत्राने वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासाठी आपली ओपनिंगची जागा सोडली. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विहान मल्होत्रा भारतीय अंडर-19 टीममधील स्थान गमावण्याच्या मार्गावर होता, त्याच्या बॅटमधून रनही येत नव्हत्या. इनिंगची सुरूवात करताना विहानला सतत अपयश येत होतं, त्यामुळे त्याला स्वतःची जागा वैभव आणि आयुषसाठी सोडावी लागली.

advertisement

इंग्लंड दौऱ्याच्या अगदी आधी, पटियाला येथील क्रिकेट हब अकादमीमध्ये सराव करताना मल्होत्राचे प्रशिक्षक कमलप्रीत संधू, ज्यांनी प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग, नमन धीर आणि कनिका मल्होत्रा सारख्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे, त्यांनी विहान मल्होत्राला सांगितले की त्याने तक्रार करणे थांबवावे आणि त्याच्या नवीन भूमिकेवर काम करायला सुरुवात करावी.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI आधारित तूर उत्पादन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना मिळणार आता अधिक नफा, अशी करा शेती
सर्व पहा

'त्याने आयुष्यभर ओपनिंगला बॅटिंग केली आहे, तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणे हा त्याच्यासाठी एक बदल होता. मी त्याला हे जाणवून दिले की वैभव आणि आयुषने आता सुरुवातीची जागा स्वतःची बनवली आहे. त्यांनी त्या स्थानावर उत्तम काम केले आहे, आता तुला वेगळा विचार करावा लागेल आणि स्वतःमध्ये बदल करावे लागतील. त्याने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान स्वतःचे बनवावे', असं विहानचे प्रशिक्षक म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : हवा वैभव-आयुषची, पण दम दाखवून गेला विहान... टीम इंडियाला संकटातून बाहेर काढणारा नवा हिरा!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल