इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण पण...
कोहली म्हणाला, “4 जूनसारख्या घटनेच्या धक्क्यासाठी आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला तयार करू शकत नाही. आमच्या फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण असावा, पण तो दुर्दैवी घटनेत बदलला.”
जखमी चाहत्यांसाठी प्रार्थना
या घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि जखमी झालेल्या चाहत्यांसाठी आपण प्रार्थना करत असल्याचे कोहलीने सांगितलं. तो पुढे म्हणाला, “तुमची ही हानी आता आमच्या कथेचा एक भाग आहे. एकत्रितपणे, आपण काळजी, आदर आणि जबाबदारीने पुढे जाऊ.”
advertisement
दरम्यान, या संदेशात कोहलीने या घटनेमुळे झालेल्या दुःखावर आणि त्याच्या टीमवर झालेल्या परिणामांवर प्रकाश टाकला आहे. बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या घटनेला जवळपास तीन महिने उलटल्यानंतर विराट कोहलीने आपली भावना व्यक्त केली असून, आरसीबी फ्रँचायझीनं त्याचा हा मेसेज आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.