श्रीलंकेकडून कर्णधार चमारी आटापटूने सर्वाधिक 43 रन केले, तर निलाक्षी डिसिल्वाने 35 आणि हर्षिता समरविक्रमाने 29 रनची खेळी केली. या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली. 124 रनवरच भारताने 6 विकेट गमावल्या होत्या, पण दीप्ती शर्माने अमनजोत कौर आणि स्नेह राणाच्या मदतीने भारताला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं,
advertisement
दीप्ती शर्माने 53 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली, तर अमनजोत कौरने 56 बॉलमध्ये 57 रन केले. स्नेह राणाने 15 बॉलमध्ये आक्रमक नाबाद 28 रन करून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांच्यामध्ये 103 रनची महत्त्वाची पार्टनरशीप झाली. श्रीलंकेकडून इनोका रनवीराने 4 विकेट घेतल्या. तर उडेशिका प्रबोधिनीला 2 आणि आचिनी कुलासुरिया, चामिरी अटापटूला 1-1 विकेट मिळाली.