नेमकं त्या दिवशी काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहराच्या इंदिरानगर भागातील ही घटना आहे. जिथे लसूण विक्रीचा व्यवसाय करणारा विक्रेता कुटुंबिसोबत वास्तव्यास आहे. या विक्रेताचा मुलगा नववीपर्यंत शिकला मात्र त्यानंतर तो शाळेत जाण्याऐवजी घरीच राहून वारंवार मोबाईवर असायचा.
21 नोव्हेंबर रोजीही तो मोबाईल पाहण्यात दंग होता, त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला 'मोबाईल पाहू नकोस,अभ्यासाकडे लक्ष दे' असे सांगितले. त्याचा राग मुलाला एवढा आला की तो लगेच घरातून निघून गेला. घरातून रागाच्या भरात निघून गेलेला मुलगा परत आला नसल्याने वडिलांच्या मनात भिती वाढली.
advertisement
वडिलांनी मुलाला परिसरात शोधले तसेच त्यांच्या मित्रांजवळही पाहिले पण तो कोणाकडेही गेला नसल्याचे समजले. मग काय वडिलांनी तात्काळ श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार नोंदवली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 2:44 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : वडिलांच्या ओरडण्यामुळे मुलगा घराबाहेर पडला; नंतर जे घडलं त्याने सर्वांचा उडाला थरकाप
