
जालना: कोरोना आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अक्षरशः 15 ते 20 रुपये प्रति किलोने देखील द्राक्ष कोणी घ्यायला तयार नव्हतं. परंतु अशाही परिस्थितीत खचून न जाता द्राक्षबाग जगवलेल्या शेतकऱ्यांना आता अच्छे दिन आले आहेत. जालन्यातील नंदापूर येथील विलास टेकाळे यांनी साली तीन एकरची द्राक्षबाग फुलवली असून या माध्यमातून त्यांना 30 ते 40 लाखांचं निव्वळ उत्पादन होणार आहे. पाहुयात कसं केलं टेकाळे यांनी द्राक्ष बागेचे नियोजन.