
बीड : आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर फक्त पिकांवर अवलंबून राहणे शेतकऱ्यांसाठी जोखमीचे ठरत आहे. अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढ-उतार यामुळे पारंपरिक शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढवण्याचा आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा प्रभावी मार्ग ठरत आहेत. कमी भांडवल, कमी जोखीम आणि वर्षभर उत्पन्न ही या व्यवसायांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.