
छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील छाया बांदल या गेल्या दोन वर्षांपासून केळी चिप्स बनवण्याचं काम करत आहे. याबरोबरच त्यांचे पती बाबासाहेब बांदल 2010 पासून रसवंती गृह चालवतात. त्यामुळे ग्राहक चांगले ओळखीचे झाले, ओळख निर्माण झाल्यामुळे केळी चिप्स व्यवसायाला सुद्धा चांगले प्रोत्साहन मिळाले. केळी चिप्स विक्रीच्या माध्यमातून दररोज 3 ते 4 हजार रुपयांची उलाढाल होते तर महिन्याकाठी 1 लाख रुपयांच्या जवळपास उलाढाल होते. याबरोबरच केळी चिप्सचा व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
Last Updated: Jan 05, 2026, 17:31 ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लावला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं ? हे त्यांनाही माहिती आहे. पण विकासावर बोलता येत नाही. तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरु. दोघंही भाऊ तेच तेच बोलतात.
Last Updated: Jan 08, 2026, 18:39 ISTउपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगीलीतील मिरजेत मोठा धक्का ऐन निवडणुकीत मिळाला आहे. त्यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. आझम काझी असं उमेदवाराचे नाव आहे. त्यांच्यासोबतच 8 जणांना हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 18:15 ISTभाजपचे मंत्री किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केला आहे. ते आरोप करताना म्हणाले, "मी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी कोविड कफन घोटाळा केला होता. पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात 2 नंबर आरोपी किशोरी पेडणेकर होत्या. प्रतिज्ञा पत्रात त्यांनी निवडणुक अर्ज भरताना गुन्ह्यांची मीाहिती लपवली आहे."
Last Updated: Jan 08, 2026, 17:57 IST'मूड महापालिकांचा' या शो मधून डोंबिवलीकरांचा मूड काय आहे ? याचा आढावा घेतला आहे. त्यातच कल्याण-डोंबिवली पालिकेत कोण जिंकणार याचा कल यातून पाहायला मिळतात. त्यातच सगळ्या पक्षांचा विकासांवर चर्चा केल्या होत्या. तसेच उमेदवारांना का उमेदवारी मिळाली नाही याची कारणे त्यांनी सांगितली आहेत.
Last Updated: Jan 08, 2026, 17:36 ISTराष्ट्रवादीचे अजित पवार यांनी महेश लांडगेंवर निशाणा साधला आहे. तेव्हा ते म्हणाले, "भोसरीत 70 लाख किंमत असलेला पूल 7 कोटी खर्चून बांधला. बिबट्याला रक्ताची चटक लागली की तो माणसं ठार मारतो. तिथून त्यांच्या भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. यांच्याकडे काही नव्हतं. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली की असंच होतं. " अशी बोचक टीका लांडगेंवर नाव न घेता अजित पवार यांनी घेतली आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 17:09 IST