
छत्रपती संभाजीनगर: कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार हे एआय ॲप राज्यभर सुरू केले आहे. त्यात शेती विषयक, हवामानासंदर्भात माहिती, पीकविषयी सल्ला, पिकांना द्याव्या लागणाऱ्या खतांच्या मात्रांचा अंदाज आणि कीडरोगांविषयी माहितीसह बाजारभाव पाहण्याची सुविधा आहे. महाविस्तार ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॉट देण्यात आला आहे. या चॅटबॉटला शेतकरी प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेती कामात निश्चित मदत होणार आहे.
Last Updated: December 04, 2025, 13:25 ISTपुणे: महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे. या दिवसांत अनेकांची तक्रार असते की शरीरावर सूज येते, अंगदुखी जाणवते. यामागचे कारण म्हणजे याकाळात थंड वाऱ्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या भागात रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे त्वचा लालसर होणे, सूज येणे अशा समस्या जाणवतात. अशावेळी अनेक जण घरगुती उपाय म्हणून आग, चूल किंवा हीटरला हात-पाय सरळ लावून उष्णता देण्याचा प्रयत्न करतात पण हे उपाय शरीराला हानिकारक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल डॉ. कृत्तिका अग्रवाल यांनी लोकल 18 ला सविस्तर माहिती दिली आहे.
Last Updated: December 04, 2025, 13:03 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळा सुरू आहे.आपण जशी आपली स्कीन ची काळजी घेतो.तशीच आपल्या केसाची काळजी घेणे आवश्यक असते.कारण की हिवाळ्यात आपले केस हे मोठ्या प्रमाणात फ्रीझी होतात. मोठ्या प्रमाणात कोंडा देखील होतो तर ह्या हिवाळ्यात आपले हेअर केअर रूटीन कसे असावे हे जाऊन घेऊ.
Last Updated: December 03, 2025, 20:26 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळ्या सुरू आहे. सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर विक्रीसाठी आलेल्या आहेत गाजर का नाही खूप फायदेशीर ठरतं. गजरामुळे डोळ्याचं आरोग्य देखील सुधारतं आणि आपल्याला फायदे देखील मोठ्या प्रमाणात होतो आपण नेहमीच गाजराचा हलवा करू लागतो पण यापेक्षा तुम्हाला वेगळं काय खायचं असेल तर तुम्ही गाजराचे लोणचे करू शकता. अगदी पाच मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतो. तर याची रेसिपी सांगितलेली आहे ऋतुजा पाटील यांनी.
Last Updated: December 03, 2025, 20:02 ISTसांगली: श्री दत्तात्रेयांच्या जागृत स्थानांपैकी एक म्हणून सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर मानले जाते. गुरु दत्तांच्या तीन महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक आहे. श्रीनृसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे औदुंबर तीर्थक्षेत्राचे महत्त्व आहे. त्यामुळेच श्री दत्त सांप्रदायिक आणि लाखो भाविकांचे औदुंबर हे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला इथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. याच श्री क्षेत्र औदुंबरचे महात्म्य पुरुषोत्तम जोशी यांनी सांगितले आहे.
Last Updated: December 03, 2025, 19:34 IST