
सोलापूर आणि औरंगाबाद मार्गावरील तेरखेडा भागात सहा चोरांनी धावत्या ट्रकवर चढून चोरी केली होती. या धक्कादायक घटनेचा VIDEO VIRAL झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. धाराशिव पोलिसांनी त्वरित कारवाई करत चोरांना अटक केली आहे
Last Updated: September 10, 2025, 13:19 ISTबीड : शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबतची जागरूकता वाढत असताना रासायनिक कीटकनाशकांऐवजी नैसर्गिक उपायांचा वापर वाढताना दिसत आहे. बाजारातील महाग कीटकनाशकांमुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकरी पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय शोधत आहेत. तज्ज्ञांच्या मते, योग्य ऑर्गॅनिक पद्धतींचा वापर केल्यास किड नियंत्रण प्रभावीपणे करता येते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते.
Last Updated: December 15, 2025, 20:12 ISTमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS), मुंबई येथे ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट : अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड’ हे नवीन दालन 12 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाले. भारतातील प्रेक्षकांसाठी प्रथमच जागतिक स्तरावर निवडलेली एक भव्य शैक्षणिक दालन मुंबईत खुले झाले आहे. सुमारे 5000 वर्षांपूर्वीचा प्राचीन जगाचा परस्परसंबंध व्यापार, लेखन, धर्म, कला आणि विचारांच्या देवाणघेवाणीमुळे कसा घडला, याची सखोल ओळख प्रेक्षकांना या दालनातून मिळणार आहे.
Last Updated: December 15, 2025, 20:00 ISTसोलापूर : अनेक तरुण उच्चशिक्षण घेऊन व्यवसायाकडे वळत आहेत. पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात राहणाऱ्या चंद्रकांत शेवाळे या तरुणाचं शिक्षण टेक्सटाइल इंजिनिअरिंग झाले आहे. नोकरीच्या मागे न धावता त्यांनी बंदिस्त शेळीपालन करायचा निर्णय घेतला. बंदिस्त शेळीपालन करत असताना आलेल्या अडचणींवर मात करत आज चंद्रकांत शेवाळे हे आठ महिन्याला आठ ते नऊ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. पाहुयात यशस्वी बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या या तरुणाची यशोगाथा.
Last Updated: December 15, 2025, 19:32 ISTपुणे: सध्या बाजारात गाजरांची मुबलक आवक झाली आहे. गाजर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. अनेकजण गाजरापासून हलवा बनवतात, पण आज आपण गाजराची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे चटपटीत गाजर-मिरचीचे लोणचे. हे लोणचे तुम्ही सहजपणे महिनाभर वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ सोप्या पद्धतीने गाजर-मिरचीचे लोणचं कसं बनवायचे.
Last Updated: December 15, 2025, 19:04 ISTपुणे : सातत्य, जिद्द आणि मेहनत या तीन गोष्टींच्या जोरावर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, हे कर्वेनगरच्या उज्वला करवळ यांनी दाखवून दिले आहे. आयटी क्षेत्रातील स्थिर नोकरी सोडून फक्त 1 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू केलेल्या लहानशा उपक्रमाने आज तब्बल 70 लाखांची उलाढाल गाठली आहे. विशेष म्हणजे, या उद्योगातून 50 महिलांना रोजगार मिळत असून महिला सबलीकरणाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
Last Updated: December 15, 2025, 18:23 IST