
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका हा संत्रासाठी प्रसिद्ध आहे. वरूड तालुक्यातील संत्र्याची चव इतर कुठे मिळणे शक्य नाही, असं नेहमी म्हटलं जातं. पण, इतरही अनेक पदार्थ असे आहेत ज्यांची चव कुठेही मिळणार नाही. त्यातीलच एक म्हणजे पांढुर्णा चौक येथील त्रिमूर्ती हॉटेल जवळील श्री यशवंत साई पोहा पॉइंट. याठिकाणी मिळणारे पोहे अतिशय टेस्टी असल्याचं खवय्यांकडून सांगण्यात येते. सकाळी 7 वाजतापासून याठिकाणी पोहे खाण्यासाठी गर्दी बघायला मिळते
Last Updated: Dec 23, 2025, 18:45 ISTसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या माळरानावर तब्बल 2 हजार वर्ष जुना विशालकाय चक्रव्यूह सापडला आहे. भारतामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह असल्याचं मानलं जात आहे. माळरानावर सापडलेला हा चक्रव्यूह तब्बल 15 घेरे असलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती नितीन अनवेकर यांनी दिली आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 20:27 ISTशरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची बातमी समोर आली. तेव्हाच पुण्याचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष यांच्या राजीनाम्याची मोठी चर्चा सुरु झाली.ते नाराज असल्याचं समजलं आहे.त्यांनी सौ.सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. चर्चा करुन निर्णय ठरवतील असे जगताप म्हणाले.
Last Updated: Dec 23, 2025, 20:16 ISTबांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत आहेत. यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांचं मत आहे की, बांग्लादेशात हिंदुंवर होणारे अत्याचार थांबावेत.त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.संघटनांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांच्या पथकाने हे सगळं नियंत्रणात आणले.
Last Updated: Dec 23, 2025, 19:56 ISTबांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत आहेत. यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांचं मत आहे की, बांग्लादेशात हिंदुंवर होणारे अत्याचार थांबावेत.त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.संघटनांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांच्या पथकाने हे सगळं नियंत्रणात आणले.
Last Updated: Dec 23, 2025, 19:56 ISTजालना : मोबाईल, इंटरनेटचे दुष्परिणाम लक्षात घेता जालना जिल्ह्यातील एका शाळेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गावातील मंदिर-मशिदीवरील भोंग्यामधून रात्री दोन तास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सांगितले जात आहे. या काळात कोणताही विद्यार्थी मोबाईल किंवा टीव्ही पाहणार नाही याची खातरजमा केली जात आहे. या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 19:51 IST