
प्रतिनिधी प्रितम पंडित: बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला महापूर आला असून काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. या घटनेमुळे मसोबाचीवाडी, बांगरवाडी, चारे, पाथरी या सह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये-जा करीत होते. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी मुले, रुग्ण व नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्या आहेत.स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.
Last Updated: September 23, 2025, 07:41 ISTचांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. 'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो याची माहिती नागपूरचे दिग्गज मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे.
Last Updated: December 09, 2025, 18:05 ISTअमरावती : यावर्षी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा देखील उद्ध्वस्त झाल्यात. आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संत्रा बाग रिकामी झाली आहे. त्यामुळे आता झाडांची काळजी घेऊन आंबिया बहारासाठी झाडे तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता संत्रा बागेचे नियोजन नेमकं कसं असावं? याबाबत माहिती कृषी मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी मयूर देशमुख यांनी दिली.
Last Updated: December 09, 2025, 17:50 ISTपुणे: पिंपरी- चिंचवड महानगरपालिका नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. तो म्हणजे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा हा उपक्रम ओंजळ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.
Last Updated: December 09, 2025, 16:55 ISTछत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील एजास शेख यांचा वडिलोत्पार्जित म्हैस पालनाचा व्यवसाय आहे. मात्र हा व्यवसाय काही कारणास्तव काही काळाने बंद झाला होता. हिंम्मत न हारता आवड म्हणून गेल्या दोन वर्षांपासून एजास म्हैसपालन आणि दुग्ध व्यवसाय नियोजित पद्धतीने पुढे नेत आहे. सुरुवातीच्या काळात दोन म्हशी खरेदी केल्या त्यांच्यापासूनच या व्यवसायामध्ये वाढ होत गेली आणि आजच्या घडीला 7 म्हशी आहेत.
Last Updated: December 09, 2025, 16:32 ISTमुंबई: आजच्या काळात सोशल मिडिया हे सर्वात भक्कम माध्यम समजलं जातं. कारण, अनेक तरुणाई या प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह असते आणि कोणत्याही विषयावर इथे पटकन आपली मत मांडता येतात किंवा आपला विचार लोकांपर्यंत सहज अवघ्या काही सेकंदात पोहोचवता येतो आणि हीच गोष्ट अनेक तरुण मनावर घेत वेगवेगळ्या विषयांवरील अनेक गोष्टी आहेत ज्या ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. असेच आता सोशल मीडियावर सकारात्मक बदल घडवणाऱ्या तरुणांमध्ये दादरचा मयुरेश गुजर हे नाव सध्या विशेष चर्चेत आहे. त्याने सुरू केलेली ‘पाप पुण्य का हिसाब’ ही सिरीज आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे, फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी नव्हे तर खऱ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी ओळखली जाते.
Last Updated: December 09, 2025, 16:02 IST