
सांगली: "जन गण मन" आपल्या प्रिय भारत देशाच्या भौगोलिक, सांस्कृतिक वारशासह विविधतेतील एकतेचे दर्शन घडवणारे गीत. अवघ्या 52 सेकंदात देशप्रेम जागृत करणारं रवींद्रनाथ टागोर लिखित भारतीय राज्यघटनेतील अधिकृत असे राष्ट्रगीत आपण प्रत्येक भारतीय ताठ मानेने आणि अभिमानाने गातो. याच राष्ट्रगीताचा दररोज जागर करत देशप्रेम जागृत ठेवणारे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे पहिलेच गाव.