
आजच्या धावपळीच्या युगात पालकांनो, तुमची मुलं एकलकोंडी किंवा रागीट होत आहेत का? त्यांच्यातील कमी होत असलेला आत्मविश्वास ही चिंतेची बाब ठरू शकते. पण यावर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय पुण्याच्या समुपदेशक उमा पाटील यांनी सुचवला आहे, तो म्हणजे \'मिरर टॉक\'. आरशासमोर उभं राहून स्वतःशी संवाद साधल्याने मुलांची देहबोली, उच्चार आणि आत्मविश्वास कसा वाढतो? आरशातल्या प्रतिबिंबाला \'गुरू\' मानल्याने मुलांच्या भविष्यात काय बदल होतील? जाणून घेण्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा !\r\n