ही छायाचित्रे पाहून फेब्रुवारी 2019 ची आठवण झाली. बालाकोट एअर स्ट्राईकने पाकिस्तानला हादरवून सोडले होते. पाकिस्तानने बालाकोट एअर स्ट्राईकनंतर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे अमेरिकेने दिलेले एफ-16 लढाऊ विमान पाडले होते.
भारत शस्त्रसंधी तोडणार! Indian Armyला मिळणार आक्रमक कारवाईचे स्वातंत्र्य
मात्र या दरम्यान भारताचे पायलट अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 लढाऊ विमान क्रॅश होऊन पीओकेमध्ये पडले आणि ते पकडले गेले. दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता आणि भारताने स्पष्ट केले होते की जर अभिनंदनला सोडले नाही. तर पाकिस्तानवर हल्ला केला जाईल. या दरम्यान पाकिस्तानमध्ये एक मनोरंजक घटना घडली होती, ज्याचा खुलासा खुद्द पाकिस्तानच्या मीडियाने केला होता.
advertisement
आम्ही भारताच्या बाजूने, पाकिस्तानच्या सर्वात जवळच्या मित्राने मारली 'पलटी'
2020 मध्ये पाकिस्तानच्या एका खासदाराने खुलासा केला होता की, भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या हल्ल्याच्या धमकीनंतर पाकिस्तानला सोडण्यास भाग पाडले गेले होते. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे नेते सरदार अयाज सादिक यांनी संसदेत बोलताना सांगितले होते की, अभिनंदनच्या अटकेनंतर तत्कालीन विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले की- जर पाकिस्तानने अभिनंदनला सोडले नाही, तर भारत 'त्या रात्री ९ वाजता' हल्ला करेल. पाकिस्तानी खासदाराने म्हटले की, त्या दरम्यान सेना प्रमुख जनरल बाजवा यांना खूप घाम फुटला होता आणि त्यांचे पाय कापत होते.
सरदार अयाज सादिक यांनी संसदेत म्हटले होते की, "मला आठवते की शाह महमूद कुरैशी त्या बैठकीत होते. ज्यात इम्रान खान यांनी भाग घेण्यास नकार दिला होता आणि सेना प्रमुख जनरल बाजवा खोलीत आले. त्यांचे पाय कापत होते आणि ते घामाने ओतप्रोत होते. विदेश मंत्र्यांनी सांगितले की देवासाठी अभिनंदनला जाऊ द्या. भारत रात्री ९ वाजता पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. जिओ न्यूजच्या वृत्तात हे खुलासे झाले होते.
