janmasthami 2025: स्तनपान करता-करताच बाळकृष्णानं धाडलं होतं तिला यमसदनी; पूतना राक्षसीण नेमकी कोण होती?

Last Updated:

janmasthami 2025: पूतना ही एक राक्षसीण होती, तिला कंस राजानं लहान मुलांना मारण्यासाठी पाठवलं होतं. कंसाला आकाशवाणीनं सांगितलं होतं की देवकीचा आठवा मुलगा त्याचा वध करेल. त्यामुळे कंस देवकीच्या प्रत्येक मुलाला जन्मतःच ठार मारत होता.

News18
News18
मुंबई : श्रीकृष्णाच्या बाललीला खूप प्रसिद्ध आहेत. पूतना राक्षसीण वध ही श्रीकृष्णाच्या बाललीलांमधील एक महत्त्वपूर्ण कथा आहे. ही कथा श्रीकृष्णाच्या जन्मानंतर काही दिवसांनी घडली होती. सध्या गोकुळाष्टमी जवळ आल्यानं सर्वत्र अष्टमीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दहीहंडीची तयारी सुरू आहे. जन्माष्टमीनिमित्त आज आपण पूतना राक्षस वध कथा जाणून घेऊ. जन्माष्टमीच्या पूजेनंतर ही कथा वाचणं शुभ फळदायी मानलं जातं.
पूतना राक्षसीण कोण होती?
पूतना ही एक राक्षसीण होती, तिला कंस राजानं लहान मुलांना मारण्यासाठी पाठवलं होतं. कंसाला आकाशवाणीनं सांगितलं होतं की देवकीचा आठवा मुलगा त्याचा वध करेल. त्यामुळे कंस देवकीच्या प्रत्येक मुलाला जन्मतःच ठार मारत होता. जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वसुदेवाने त्याला गोकुळात नंदबाबांच्या घरी पोहोचवलं, तेव्हा कंसाला कृष्णाचा पत्ता लागला नाही. यामुळे त्याने आपल्या राज्यातील सर्व लहान मुलांना मारण्याचा आदेश दिला. या कामासाठी त्याने पूतना राक्षसीणीला बोलावले.
advertisement
वध कथा - पूतना राक्षसीण खूप मायावी होती. ती हवेत उडू शकत होती आणि तिला पाहिजे ते रूप धारण करू शकत होती. कंसाच्या आज्ञेनुसार, तिने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि ती गोकुळात आली. तिने आपल्या स्तनांना विष लावले आणि लोणी खाणाऱ्या लहान बाळाच्या शोधात ती फिरू लागली.
नंदबाबांच्या घरी पोहोचल्यावर, तिने बाळकृष्णाला पाहिले. ती इतकी सुंदर दिसत होती की यशोदा मातेलाही तिच्यावर संशय आला नाही. पूतनाने मोठ्या प्रेमाने बाळकृष्णाला उचलले आणि आपल्या विषयुक्त स्तनपान देण्याचा प्रयत्न केला. पण, जसे पूतनाने बाळकृष्णाला दूध पाजायला सुरुवात केली, तेव्हा कृष्णाने केवळ दूधच नाही, तर तिच्या शरीरातील सर्व रक्त आणि प्राणही शोषून घेतले. पूतना वेदनेने ओरडू लागली आणि तिने आपले खरे राक्षसी रूप धारण केले. तिने खूप प्रयत्न केले, पण ती कृष्णाला आपल्यापासून दूर करू शकली नाही.
advertisement
बाळकृष्णाने तिचा पूर्णपणे जीव शोषून घेतला. त्यामुळे ती ओरडत जमिनीवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. तिचा शरीर इतके मोठे होते की गोकुळात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तिला पाहिले आणि ते खूप घाबरले. नंतर नंदबाबा आणि इतर लोकांनी पूतनेचे शरीर जाळले.
advertisement
कथेचे महत्त्व - पूतना वध ही कथा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे. वाईट हे कितीही शक्तिशाली असले तरी, त्याचा अंत निश्चित असतो, असा बोध आपल्याला या कथेमुळे येतो. यातून कृष्णाचे दैवी स्वरूप आणि त्याची बालपणीची असीम शक्ती दिसून येते.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
janmasthami 2025: स्तनपान करता-करताच बाळकृष्णानं धाडलं होतं तिला यमसदनी; पूतना राक्षसीण नेमकी कोण होती?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement