Surya Grahan 2025: सूर्यग्रहणाचे अशुभ परिणाम होणार नाहीत; या 4 गोष्टी करून चिंता मुक्त राहा

Last Updated:

Surya Grahan 2025: ज्योतिषतज्ज्ञांच्या मते सूर्यग्रहणाच्या वेळी धार्मिक कार्ये आणि आध्यात्मिक गोष्टी करणाऱ्यांवर कोणत्याही अशुभ ग्रहाचा परिणाम होणार नाही. ग्रहणाचा कालावधी हा पूर्णपणे भीतीचा काळ मानण्याची गरज नाही, तर आध्यात्मिक शुद्धीकरण आणि आध्यात्मिक साधना करण्याची संधी मानली पाहिजे.

News18
News18
मुंबई : या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्र सूर्याच्या एका भागाला झाकून टाकेल, ज्यामुळे तो चंद्रकोरीसारखा दिसेल. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात, सूर्याला आत्मा, ऊर्जा आणि चैतन्य यांचे प्रतीक मानले जाते. सूर्य सिंह राशीचा अधिपती आहे असून जीवनात आत्मविश्वास, तेज आणि प्रतिष्ठा मिळवून देतो. सूर्यग्रहण लागतं तेव्हा ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती असामान्य होते आणि त्यांचा थेट परिणाम मानवी जीवनावर जाणवतो. शास्त्रांनुसार, हा नकारात्मक उर्जेचा काळ आहे, म्हणून तो अशुभ मानला जातो.
सूर्यग्रहणाच्या वेळी लाभासाठी हे उपाय करून पहा -
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते सूर्यग्रहणाच्या वेळी धार्मिक कार्ये आणि आध्यात्मिक गोष्टी करणाऱ्यांवर कोणत्याही अशुभ ग्रहाचा परिणाम होणार नाही. ग्रहणाचा कालावधी हा पूर्णपणे भीतीचा काळ मानण्याची गरज नाही, तर आध्यात्मिक शुद्धीकरण आणि आध्यात्मिक साधना करण्याची संधी मानली पाहिजे.
सूर्यग्रहणाच्या वेळी देवाचे स्मरण करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. तुमच्या इष्ट देवतेचे नाम जपणे, विशेषतः ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, किंवा ओम सूर्याय नमः सारखे मंत्र जपल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. या काळात धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. भगवद्गीता, रामचरितमानस किंवा नारायण कवच यांचे पठण केल्याने पापांचे शुद्धीकरण होते आणि कौटुंबिक त्रास दूर होण्यास मदत होते. वेळ नसल्यास काही मंत्र-स्तोत्र म्हणणे देखील शुभ मानले जाते.
advertisement
याशिवाय, साधकांनी या काळात आध्यात्मिक साधना आणि ध्यान करावे. सुतक काळात आणि ग्रहण काळात ध्यान केल्याने आध्यात्मिक शांती मिळते आणि अस्वस्थता दूर होते. शिवाय, या काळात दान करणे विशेषतः महत्त्वाचे मानले जाते. रात्रीच्या वेळी लगेच दान करणं शक्य नसल्यानं ते करण्याचा संकल्प करा. गूळ, गहू, तीळ आणि धान्य दान करणे विशेषतः शुभ मानले जाते.
advertisement
सूर्यग्रहण दरम्यान या क्रिया टाळा - सूर्यग्रहण दरम्यान कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत, शुभ कार्यक्रम टाळावेत. अन्न शिजवणे आणि खाणे देखील योग्य मानले जात नाही. झोपण्याऐवजी प्रार्थना आणि ध्यानासाठी वेळ देणे चांगले, मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Surya Grahan 2025: सूर्यग्रहणाचे अशुभ परिणाम होणार नाहीत; या 4 गोष्टी करून चिंता मुक्त राहा
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement